अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार, 30 ऑगस्ट 2021, स. 11.00
● सोमवारी अहवालात 469 बाधित
● एकूण 12,097 जणांची तपासणी
● जिल्ह्यात 3,150 बेड रिक्त
● ऑगस्ट मध्ये चार वेळा वर 500 च्या खाली
सातारा / प्रतिनिधी :
शनिवारी रात्रीच्या अहवालात 424 जणांचा अहवाल बाधित आल्याने सलग तिसऱ्या वेळी बाधित संख्या 500 च्या खाली गेल्याचा दिलासा लाभला. असे असतानाच ऑगस्ट अखेरीस सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा बाधित वाढ पाचशेच्या खाली घसरल्याचा मोठा दिलासा लाभला आहे. रविवारी रात्रीच्या अहवालात 469 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. ऑगस्ट महिन्यात चार वेळा बाधित वाढ पाचशेच्या खाली गेली होती. मात्र ती 400 च्या खाली गेलेली नाही. तीन अंकी संख्येने जिल्ह्यात बाधित वाढ सुरू असली तरी ऑगस्ट अखेरीस ती पाचशेच्या खाली घसरू लागली असल्याचा दिलासा आहे. लवकरच हा कोरोनाचा कहर संपावा अशीच प्रत्येकाची भावना आहे.
रविवारी अहवालात 469 बाधित
रविवारी रात्री प्रशासनाकडून देण्यात आलेल्या अहवालामध्ये एकूण 12,097 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे आहे यामध्ये बली तोड पुन्हा पाचशेच्या खाली राहिली असून 469 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे यामध्ये जिल्ह्याचा एकूण पॉझिटिव्हिटी 3.88 एवढा दिलासादायक खाली राहिलेला आहे.
वाढ रोखण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज
जिल्ह्यात गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेला कोरणा चा कहर संपत नसल्याने अनलॉक झालेला असला तरी कोरोणा स्थितीमुळे नागरिक पॅनिक आहेत. त्यातच प्रशासनाकडून आकडेवारीचे घोळ होत आहेत. काही नागरिक तीन-चार ठिकाणी टेस्टिंग करत असल्याने आकडेवारीचे डब्लिंग होत आहे. तसेच काही लॅब जिल्ह्यात अनधिकृतपणे टेस्टिंग करत आहेत. या एकूण सर्वामुळे आकडेवारीतील पारदर्शकता राहत नसल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर कमी जास्त होत आहे. जिल्हा कोविड हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्ह्यातील सर्व लॅब यांच्या व्यवस्थापनावरच प्रशासनाला ठोसपणे काम करावे लागेल आणि जे गफलत करतात त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा लागेल.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 17,75,183
एकूण बाधित 2,38,613
एकूण कोरोनामुक्त 2,26,274
मृत्यू 6,006
उपचारार्थ रुग्ण 9,693
रविवारी जिल्हय़ात
बाधित 424
मुक्त 71
मृत्यू 14