पोलीस आयुक्तांचे बेळगावकरांना आवाहन : वाहने जप्तीचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारीचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड कर्फ्यू जारी केला आहे. शुक्रवारी रात्री 8 पासूनच कर्फ्यूला सुरुवात होत असून या काळात नागरिकांनी अनावश्यकपणे फिरणे टाळावे. नहून त्यांची वाहने जप्त करण्यात येतील, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिला आहे.
शुक्रवारी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विकेंड कर्फ्यूसंबंधीची माहिती दिली. यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदी अधिकारी उपस्थित होते.
सरकारने जारी केलेल्या नियमावलींचे प्रत्येकाने पालन करावे. कारण ते नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच आहेत. कर्फ्यूच्या काळात गरजेशिवाय अनावश्यक फिरणे टाळावे. या काळात दूध, किराणा दुकाने, औषध दुकाने, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू असणार असली तरी त्याच निमित्ताने नागरिकांनी अनावश्यकपणे फिरू नये, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे.
जागृती मोहीम हाती घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांशी आपली चर्चा झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. विकेंड कर्फ्यू पुढच्या आठवडय़ातही राहणार आहे. याकाळात नागरिकांशी संयमाने वागण्याचा सल्ला पोलिसांनाही देण्यात आला आहे. कारणाशिवाय रस्त्यावर आढळणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच वाहने जप्त करण्याची सूचना करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
तपास नाक्मयांवर तपासणी वाढविण्यात येणार
जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी किती वेळ ठरविला आहे? या प्रश्नावर यासाठी वेळ ठरवून देण्यात आला नाही. म्हणून खरेदीच्या निमित्ताने अनावश्यक फिरणे टाळावे, असे आवाहन करतानाच बाची, राकसकोप, चलवेनहट्टीसह पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील चार तपास नाक्मयांवर तपासणी वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.