एकूण 55 तासांचा विकेंड कर्फ्यू, वर्दळीच्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून अडवणूक : शुक्रवारी रात्री 9.30 नंतर शहरात पसरला शुकशुकाट
प्रतिनिधी /बेळगाव
पोलिसांच्या सूचना आणि आवाहन, नागरिकांची घरी जाण्यासाठी पळापळ, विपेत्यांची शक्मयतो साहित्य विकून जाण्याची धडपड, तुरळक प्रमाणात सुरू असलेल्या बस आणि ठिकठिकाणी विकेंड कर्फ्यूची चर्चा, असे चित्र शुक्रवारी रात्री पहायला मिळाले. पोलीस आणि प्रशासनाने विकेंड कर्फ्यूची पूर्ण तयारी करून सर्वत्र बंदोबस्तासाठी शुक्रवारी संध्याकाळपासून सुरुवात केली. पोलीस प्रशासनाने महत्त्वाच्या वर्दळीच्या रस्त्यांवर बॅरिकेड्सही आणून ठेवले होते.
कोरोना व त्यानंतर नव्याने डोके वर काढलेल्या ओमिक्रॉनमुळे खबरदारीचा उपाय म्हणून तसेच संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने विकेंड कर्फ्यू जाहीर केला. यावषीचा हा पहिलाच विकेंड कर्फ्यू. अर्थातच गेल्या काही महिन्यांमध्ये सुरळीत व्यवहार सुरू असल्याने काहीशा निर्धास्त झालेल्या बेळगावकरांना विकेंड कर्फ्यूला सामोरे जाणे अपरिहार्य ठरले. आरोग्याचा प्रश्न असल्याने बेळगावकरांनी प्रशासनाला सहकार्य केल्याचेही पहायला मिळाले.
हा विकेंड कर्फ्यू एकूण 55 तासांचा आहे. शुक्रवारी रात्री 8 पासून सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत विकेंड कर्फ्यूचा कालावधी आहे. अर्थात अत्यावश्यक सेवा सुरू राहणारच आहेत. दोन दिवस कर्फ्यू असल्याने शुक्रवारी सकाळपासून बाजारपेठेत गर्दी होणे अपेक्षितच होते. दिवसभर बाजारपेठेत गर्दी पहायला मिळाली. मात्र साधारण सायं. 7 वाजल्यापासून ठिकठिकाणी पोलिसांनी लोकांना 8 पूर्वी सर्व व्यवहार बंद करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली.
शहापूरसह अन्य भागातील व्यवहार 8 नंतर हळूहळू बंद
नागरिकांनीही पोलिसांच्या आवाहनाची नोंद घेत शक्मयतो आठपूर्वी घरी जाण्यासाठी लगबग सुरू केली. गणपत गल्ली, भाजीमार्केट या ठिकाणी सुमारे 7.45 वाजण्याच्या दरम्यान दुकानदारांनी दुकानांचे शटर खाली करण्यास सुरुवात केली. तथापि, भाजी आणि फूलविपेते मात्र शक्मयतो भाजी आणि फुलांची विक्री होईल, या आशेने ताटकळत होते. मध्यवर्ती बाजारपेठेच्या तुलनेत शहापूर आणि अन्य भागातील व्यवहार 8 नंतर हळूहळू बंद झाले.
बॅरिकेड्समुळे गैरसोय
नरगुंदकर भावे चौकात ग्राहक येण्याच्या आशेने भाजीविपेते बसले होते. तथापि, दरामध्ये मात्र फारसा काही फरक दिसून आला नाही. आरपीडी क्रॉस येथे पोलिसांनी 8 पूर्वीच बॅरिकेड्स लावून रस्ते अडवून ठेवले. मात्र घरी परतणाऱया वाहनचालकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. अनगोळ नाका येथेही असेच चित्र दिसून आले.
रात्री 8 च्या दरम्यान शहरात तुरळक प्रमाणात बससेवा सुरू होती. प्रवाशांनी शक्मयतो बसने जाण्यास प्राधान्य दिल्याने बसमधील प्रवाशांची संख्या अधिक प्रमाणात दिसून आली. पोलीस सतत सर्व व्यवहार बंद करा, घरी जावा, असे आवाहन करत होते. 7 पासून त्यांनी विकेंड कर्फ्यूचे आवाहन करण्यास सुरुवात केली तरी साधारण 9 च्या सुमारास बऱयापैकी व्यवहार बंद झाल्याचे आढळले. मात्र हळूहळू संपूर्ण व्यवहार रात्री 9.30 नंतर बंद होऊन शहरात शुकशुकाट पसरला. परंतु ऊस वाहतूक करणारे ट्रक आणि अन्य अवजड वाहनांची ये-जा सुरू होती.
हॉटेल्समधून पार्सल नेणाऱयांची संख्याही अधिक
विकेंड दरम्यान कुटुंबीयांसह बाहेर जाऊन हॉटेलमध्ये भोजन करण्याचे प्रमाण अलीकडे वाढू लागले आहे. विकेंड कर्फ्यूमुळे त्यावर मर्यादा आल्या. त्यामुळे शुक्रवारी रात्री हॉटेल्समध्ये 8 पूर्वीच गर्दी झाली. तसेच पार्सल नेणाऱयांची संख्याही अधिक प्रमाणात दिसून आली.