विकेंड कर्फ्यूची भीती राहिल्याने बाजारात वर्दळ कमी
प्रतिनिधी /बेळगाव
शासनाने विकेंड कर्फ्यू रद्द केला असला तरी नागरिकांनी शनिवारसह रविवारीदेखील बाजारपेठेकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. विकेंडमुळे दोन आठवडे बाजारपेठेत शांतता पसरली होती. मात्र विकेंड रद्द होताच बाजारपेठेत गर्दी होईल, असे वाटत होते. मात्र शनिवारी बाजाराचा दिवस असून म्हणावी तशी गर्दी झाली नव्हती. तर रविवारीही किरकोळ वर्दळ वगळता बाजारपेठेत शांतता होती.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील दोन आठवडय़ात शनिवार, रविवार विकेंड कर्फ्यू लागू केला होता. दरम्यान विकेंड काळात उलाढालीवरही परिणाम झाला होता. विकेंड मागे घेतल्यानंतर ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने उलाढाल काही प्रमाणात कमीच आहे. बँक, शाळा व इतर काही व्यवहार बंद राहिल्याने शहरात येणाऱया नागरिकांची संख्या कमी झाली होती. शिवाय अद्याप काहींच्या मनात विकेंड कर्फ्यूची भीती राहिल्याने बाजारात वर्दळ कमी पहायला मिळाली.
शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, समादेवी गल्ली, खडेबाजार, किर्लेस्कर रोड, कडोलकर गल्ली, काकतीवेस रोड, शनिवार खूट आदी भागात खरेदीसाठी किरकोळ नागरिक दिसून आले. विकेंड संपल्यानंतर बाजारपेठ पूर्वपदावर आली असली तरी खरेदीसाठी होणारी गर्दी कमी दिसून येत आहे. त्यामुळे विकेंड संपला तरी रविवारी विकेंड असल्यासारखी परिस्थिती पहायला मिळाली. दोन आठवडे विकेंड काळात बाजारपेठ बंद राहिल्याने व्यापारी, लहान-मोठे विपेते व कष्टकऱयांना फटका बसला होता. त्यातच शनिवारी रविवारी बाजारपेठ सुरू असूनदेखील ग्राहकांनी पाठ फिरविल्याने व्यापाऱयांना फटका बसला.
विकेंडबाबत भीती
विकेंड संपला असला तरी अद्याप ग्रामीण भागातील काही नागरिकांमध्ये विकेंडबाबत मनात भीती आहे. त्यामुळे शनिवार रविवारी शहरात विकेंड कर्फ्यू आहे. या भीतीने शहराकडे येण्यास धजावत आहेत.