शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी, नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोना प्रादुर्भावाचा धोका
प्रतिनिधी / बेळगाव
दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊनमुळे सक्तीने घरात बसलेल्या नागरिकांनी सोमवार उजाडताच नेहमीप्रमाणे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. आता लॉकडाऊन सोसण्याची नागरिकांची सहनशीलता संपुष्टात येत आहे. अनेक स्वरुपाची कामे खोळंबली असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. शिवाय घरात बसावे लागल्याने बाहेरच्या मोकळय़ा हवेत कधी जाऊ असे त्यांना वाटत असल्याने सोमवार उजाडताच शहरातील महत्त्वाच्या सर्व रस्त्यांवर नागरिकांची आणि वाहनांची गर्दी दिसून आली.
सोमवारी सकाळी बाजारपेठेत किराणा दुकाने, स्वीटमार्ट, बेकरी, इलेक्ट्रिक साहित्याची दुकाने पहाटे 6 च्या दरम्यानच उघडलेली दिसून आली. या सर्व दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर फिरते विपेतेही साहित्य घेऊन फेरफटका मारत होते. मात्र, प्रामुख्याने सर्वाधिक गर्दी झाली ती भाजी खरेदीसाठी. कोरोना काळात नागरिकांची भाजीची गरज लक्षात घेऊन बहुसंख्य तरुणांनी भाजी विक्रीचा व्यवसाय नव्याने सुरू केला आहे. ही तरुणाई हौदा रिक्षामध्ये किंवा व्हॅनमध्ये भाजी घालून सर्वत्र फिरून विक्री करत आहेत. रस्त्यावर बसून भाजी विकणाऱयांच्या संख्येतही वाढ झाली आहे. भाजीबरोबरच मोड आलेली कडधान्ये विकणाऱयांची संख्याही गतवर्षीच्या तुलनेत वाढली आहे.
शहरातील सर्व ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी दिसून आली. अनगोळ, शहापूर व खासबाग भाजी मार्केट, आरपीडी क्रॉस, झेंडा चौक, कांदा मार्केट, नरगुंदकर भावे चौक, पहिले रेल्वेगेट, समादेवी गल्ली, काकतीवेस तसेच उपनगरे येथे भाजी विपेते सकाळी लवकरच दाखल झाले. सकाळच्या पहिल्या दीड तासात खरेदी उरकून घेण्याची घाई प्रत्येकालाच होती. त्यामुळे विपेते सांगतील तो दर देऊन खरेदी होत होती. तथापि, 9.30 नंतर पोलिसांचा वावर सुरू होताच विपेत्यांनी दराबाबत ठाम न राहता फारशी घासाघीस न करता विक्री केल्याचेही दिसून आले.
शहराच्या मुख्य बाजारपेठांमध्ये पोलीस पाहायला मिळतात. परंतु आतल्या गल्ल्यांमध्ये पोलिसांचा वावर नसल्याने तेथे 10 वाजत आले तरी खरेदी सुरूच असते. मुख्य म्हणजे कोरोनाने जबरदस्त दणका देऊनसुद्धा अद्यापही नागरिकांना मास्क परिधान, सामाजिक अंतर पाळणे याचे गांभीर्य अद्यापही आलेले नाही. त्यामुळे अद्यापही विनामास्क फिरणारे नागरिक आणि तरुणसुद्धा दिसत आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ज्ये÷ नागरिकांनी शक्मयतो बाहेर जाऊ नये असे प्रशासन सांगत असले तरी बाजारपेठेत व प्रामुख्याने किराणा दुकानांमध्ये त्यांचीच संख्या अधिक दिसत आहे.
शक्मयतो सकाळी 7 ते 8.30 वा. या दरम्यान खरेदी उरकून घेण्यावर नागरिकांचा भर आहे. त्यामुळे पादचारी व दुचाकी आणि चार चाकी वाहन चालक, माल वाहतूक करणारे टेम्पो यांच्या वाहनांची गर्दी होत आहे. परिणामी सर्वच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रामुख्याने गोवावेस सर्कल, दुसरे रेल्वेगेट, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक या सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून आले.
सरकारच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष
सरकारने दूध, औषधे, भाजी, फळफळावळे, मांस विक्री यांची जीवनावश्यक साहित्यामध्ये गणना केली आहे. डॉक्टरांसह आरोग्य सेवक, रुग्णवाहिका, बँकर्स, माध्यम प्रतिनिधी यांना सेवा करण्यास मुभा दिली आहे. मात्र, बेळगावसह अन्य 11 जिल्हय़ांमध्ये सकाळी 6 ते 10 पर्यंत खरेदीसाठी मुभा दिली गेली आहे. अन्य जिल्हय़ात सकाळी 6 ते दुपारी 2 अशी वेळ आहे. म्हणजेच इतर जिल्हय़ांना काही तासांचा अवधी वाढीव मिळाला आहे. मात्र, आता सर्वांचेच डोळे 21 जूनला लॉकडाऊनबाबत सरकार कोणता निर्णय घेते याकडे लागले आहेत. पुढचा शनिवार, रविवार म्हणजेच 19, 20 तारखेचा लॉकडाऊन हा शेवटचा ठरावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा आहे.