अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 12 जून 2021, सकाळी 11.15
●शनिवारी दिवसभरात 7141 टेस्ट अन पॉझिटिव्ह 833 ●बाधित होण्याचे प्रमाण कमी आल्याने दिलासा●कृषीची 4 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा ●शैक्षणिक दुकानांना दि.14 पासून सकाळी 9 ते 2 या वेळेत घरपोच साहित्य पुरवण्याची सवलत ●बाधित होण्याचे आणि कोरोना मुक्तीचे प्रमाण समान ●संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाची तयारी
सातारा / प्रतिनिधी :
जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन शिशील करून पाचव्या दिवशी विकेंड लॉकडाऊन आल्याने पुन्हा सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्व दुकाने शटर डाऊन झाली आहेत. पोलिसांनी पुन्हा सर्वसामान्यावर दंडुका उगारला आहे. त्यामुळे नाराजी आहे. शनिवारी दिवसभरात 7141 टेस्ट झाल्या आहेत.त्यात 833 जण पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आणि कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण समान आहे.
बाधित होण्याचे होऊ लागले कमी प्रमाण
जिल्हा प्रशासनाने केलेला आकडे अपलोड घोटाळा तरुण भारतने उघडकीस आणून प्रशासनांने केलेला चूकीचा लॉकडाऊन शिथिल करायला भाग पाडले. तेव्हापासून बाधित होण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. गेल्या पाच दिवसापासून दररोज 7 हजारच्या आसपास तपासणी केल्या जात आहेत. दिवसभरात सुमारे 800 च्या दरम्यान बाधित आढळून येत असून, तेवढेच दररोज कोरोना मुक्त होऊ लागले आहे. जिल्हावासीयांना दिलासा मिळू लागला आहे.
शिथिलता आणण्यासाठी प्रशासन घेऊ लागले निर्णय
जिल्हा प्रशासनाला लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत जागे करावे लागले.आता हळूहळू दररोज जिल्हा प्रशासन एकेका आस्थापनाला सवलत देत आहे. त्यात काल सायंकाळी उशिरा जिल्हा प्रशासनाने काढलेल्या पत्रकान्वये जिल्ह्यात सुरू असलेल्या पेरणीच्या अनुषंगाने दुपारी चार पर्यत कृषी दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे.तर शालेय साहित्य घरपोच पोहचवण्यासाठी दुपारी 2 पर्यत सवलत दिली आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बालकांना कोरोना होऊ नये म्हणून तयारी
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा झटका सातारा जिल्हावासीयांना चांगला बसला. परंतु संभाव्य तिसरी लाट आली तर त्या लाटेत लहान मुलांना बाधा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे आढावा घेत सूचना करत आहेत.
अन् वाईचे प्रबंधित क्षेत्र झाले खुले
तब्बल दोन महिने वाई शहर व तालुक्यातील सर्व व्यवसाय बंद होते.प्रशासनाकडे वारंवार व्यापारी महासंघ प्रतिबंधित क्षेत्र खुले करण्याची मागणी करत होते.आमदार मकरंद पाटील, माजी आमदार मदन भोसले यांच्याकडे व्यापारी महासंघाने मागणी केली होती. शनिवारी व्यापारी महासंघांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शनिवारी सायंकाळी उशिरा वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांना वाईचे प्रतिबंधित क्षेत्र शिथिल करण्याचा निर्णय घ्यावा लागला.मात्र, शनिवारी विकेंड लॉकडाऊन असल्याने वाईकरांना दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शनिवारपर्यंत बाधित – 179778, घरी सोडण्यात आलेले – 164361, मृत्यू – 4004, उपचारार्थ रुग्ण -11436