वार्ताहर/ किणये
गणरायाच्या स्वागतासाठी तालुका सज्ज झाला आहे. यंदा कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तालुक्मयाच्या विविध भागात अगदी भक्तीभावाने व पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. दरवषी या उत्सव काळात सर्वत्र जल्लोष असतो. परंतु यावषी कोरोनामुळे काही निर्बंध प्रशासनाने लादले आहेत.
मंदिर नसलेल्या मंडळांनाच मंडप उभारणीची मुभा प्रशासनाने दिली असून मंडप उभारणीचा आकारही कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या अगदी तोंडावरच हा निर्णय दिला असल्यामुळे मंडप उभारणीसाठी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती. काही सार्वजनिक मंडळाचे सदस्य शुक्रवारीही गणेशोत्सवासाठी परवानगी घेण्याच्या धावपळीत होते.
कोरोनामुळे सारेजण ग्रासले आहेत. बाप्पांच्या आगमनामुळे भक्तांमध्ये उत्साह दिसून येणार आहे. हे कोरोनाचे संकट दूर करावे, अशीच बाप्पांकडे साऱया भक्तांची मागणी असणार आहे. गावागावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन प्रशासनाच्या नियमावलीनुसार गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.
तालुक्मयाच्या पिरनवाडी, बेळगुंदी, कंग्राळी, कणबर्गी, सांबरा, हिंडलगा, येळ्ळूर, आदी मुख्य गावांच्या बाजारपेठांमध्येही साहित्यांची खरेदी करताना नागरिकांची गर्दी दिसून आली. पुजेसाठी लागणारी पाच फळे, केळी, मांटोळी, नारळ, फुले, हार, उदबत्ती, सजावटीसाठी लागणारे साहित्य, चांदीचं नाणं यांची खरेदी करण्यात भक्तगण दंग होते.
वैयक्तिक घरगुती गणेशोत्सवासाठी जोमाने तयारी सुरू होती. भक्तमंडळी घरांमध्येही विविध प्रकारचे देखावे तयार करण्याची लगबग गेल्या दोन दिवसापासून चालली होती. थर्मोकोल, लाकडी व काही ठिकाणी हलते देखावे तयार करताना बालचमू दिसत होते. एकंदरीत कोरोना महामारी असली तरी विघ्नहर्त्या गणरायावर भक्तांची अधिक श्रद्धा असल्यामुळे साध्या पद्धतीने व भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निश्चय भक्तांनी केला आहे..