जिल्हय़ात आनंदी-मंगलमयी वातावरणाची बरसात
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मनाला नवी उमेद देणारा, सर्व विघ्ने हरण करीत संकटकाळात भावभक्तीच्या रुपात साथ करणारा, आनंदी-मंगलमय वातावरणाची बरसात करणाऱया कोकणवासीयांच्या लाडक्मया बाप्पांची शनिवारी जिल्हाभरात नियमांच्या अधीन राहून प्राणप्रतिष्ठापना होत आहे. कोरोनाच्या या संकटकाळात होत असलेल्या या गणेशोत्वात बाप्पानेच सर्व विघ्न हरावीत असा आशावाद ठेवत जिल्हय़ात 1 लाख 66 हजार 660 घरगुती गणपती मुर्तीचे आज पूजन होणार आहे.
संपूर्ण कोकणात गणेशोत्सवामुळे नवचैतन्य पसरत़े अस्सल पारंपरिक आणि घरगुती गणेशोत्सवाचं विशेष महत्व असणाऱया रत्नागिरी जिह्यात शहरातील गणेश आगमानाचा डामडौल मिरवणुकीचा असत़ो यंदा कोरोनामुळे गणेशभक्तांनी शासकीय नियमांचे पालन करत साधेपणानेच तीन दिवस आधीपासूनच गणेश मुर्ती आणण्यास सुरूवात केल्याचे चित्र होते. ग्रामीण भागात आगमनाचा उत्साह यंदाही दिसून आला. बहरलेल्या शेता-भाताच्या पायवाटेने गणेशभक्त डोक्यावरून आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन येताना दिसत होते.
खरेदीसाठी गर्दी
कोरोनामुळे यंदाच्या गणेशोत्सवार अनेक बंधने आली असली तरी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तालुक्मयांच्या मुख्य ठिकाणांसह गावागावात खरेदीसाठी चांगलीच गर्दी झाली होती. शहाळी, फळे, फुले, पूजन साहित्य आदीबरोबरच सालाबादप्रमाणे उत्सवी खरेदी करण्याकडे लोकांचा कल होता. गर्दी होऊ नये, म्हणून मोठी खरेदी काही दिवस अगोदरच करून ठेवण्यात आली होती.
स्वागतासाठी सजावट सज्जता
गणपती सणाचे उत्सवी स्वरुप थाटामाटाचे असते. यावषी आपत्कालीन परिस्थितीचे भान राखत, निरुत्साही वातावरणातही उत्साहाची उमेद बाळगत बाप्पांच्या स्वागतासाठी सजावटीची सज्जता करण्यात आली. दरवषी विशेषत: चाकरमानी सजावटीचे साहित्य येताना आपल्यासोबत आणतात. फुलांच्या विविधरंगी माळा, मोत्यांचे हार, हिरे, तोरणे आदी विविध साहित्याचा त्यामध्ये भरणा असतो. यावर्षी मात्र स्थानिक बाजारपेठेवरच भर होता.
अनंत चतुर्दशी 1 सप्टेंबर रोजी
हरितालिका, गणेश चतुर्थी, गौरी आवाहन, गौरीपूजन व ज्येष्ठा गौरी विसर्जन हे गणपती उत्सवातील सुरुवातीचे विशेष दिवस मानले जातात. गौरीचे आवाहन मंगळवार, 25 रोजी असून सोनियाच्या पावलांनी येणाऱया गौरीची विधीवत प्रतिष्ठापना ‘श्रीं’च्या बाजूलाच केली जाते. बुधवारी, 26 रोजी गौरीपूजन असून गुरुवारी, 27 रोजी दुपारी 12 वाजून 36 मिनिटांनंतर गौरी विसर्जन करायचे आहे. यावषी मंगळवारी, 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे.
ऑनलाईन पूजनाचीही तयारी
यावषीच्या आपत्कालीन स्थितीमुळे पुरोहितांना फिरणे शक्मय नसल्याने पुस्तक वाचून तसेच ऍपद्वारे, तर काही ठिकाणी पूजनाच्या ऑनलाईन कार्यक्रमाची तयारी होत आहे.
जिह्यात 1 लाख 66 हजार घरगुती गणपती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिह्यात घरगुती गणेशोत्सवाच्या संख्येत घट होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, गणेशभक्तांचा उत्साह कायम दिसून आला. यंदा 1 लाख 66 हजार 660 घरी गणपतीचे पूजन केले जाणार आहे. तर 108 सार्वजनिक गणेशोस्तव साधेपणाने साजरे होणार आहेत.
संकट पूर्ण टळू देत!
काळजी घेत उत्सवी वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ टप्प्याचा पुढचा प्रवास सुकर होत संकट पूर्ण टळू देत, अशीच सार्वत्रिक भावना संकटविमोचक, विघ्नहर्त्या गणरायासमोर व्यक्त केली जाणार आहे.
असे आहेत मुहूर्त
शनिवारी सायंकाळी 7 वाजून 57 मिनिटांपर्यंत भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे. श्री गणेश मूर्तीची स्थापना सकाळी 11 वाजून 25 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 56 मिनिटांपर्यंत करावी, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे. या वेळेत ज्यांना स्थापना करता येणार नाही, त्यांनी पहाटे पाचपासून दुपारी तीन वाजेपर्यंत गणेश स्थापना केली, तरी चालेल, असेही त्यांनी म्हटले आहे.