प्रतिनिधी /बेळगाव
विजयनगर येथे बंद पडलेले पथदीप व पाण्याच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या नागरिकांनी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी त्यांनी या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ प्रयत्न केला.
आमदार हेब्बाळकर यांनी तात्काळ हेस्कॉम अधिकाऱयांना फोन करून बोलावून घेतले. त्यांना ही समस्या सांगून पथदीप सुरू करून घेतले. त्याचसोबत महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱयांना फोन करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. यामुळे परिसरातील नागरिकांनी आमदारांचे आभार मानले..