वार्ताहर/ सांबरा
विजयनगर हिंडलगा येथे भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालयामध्ये भाजपा रयत मोर्चाच्यावतीने आयोजित शेतकरी सभा उत्साहात पार पडली.
केंद्र सरकारने शेती व शेतीमाला संबंधित तीन कायदे अंमलात आणल्याबद्दल शेतकरी बांधवांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला रयत मोर्चा बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शेखर कुलकर्णी यांच्या हस्ते ट्रक्टरचे पूजन करण्यात आले तर विभाग सह प्रभारी बसवराज यनकंची यांनी गो पूजन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातील भाजपा रयत मोर्चाचे राज्य अध्यक्ष इरण्णा कडाडी यांच्या हस्ते धान्याच्या राशीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना कडाडी म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारी शेतकरी वर्गाचे उत्पन्न डबल करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सॉईल हेल्थ कार्ड, किसान सम्मान योजना सुरु केल्या आहेत. आणि आता शेतकरी आपला माल थेट व्यापाऱयाला विकू शकतो यासाठी कायदा अंमलात आणला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी भाजपाचे ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव हे होते. सभेस माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी आमदार मनोहर कडोलकर, युवराज जाधव, पंकज घाडी, हेमंत पाटील, प्रविण पाटील, अनिल पाटील, उमेश शिंदोळकर, बसवराज दमनगी सह शेतकरी बांधव उपस्थित होते.