सौ. विजया नाईक यांच्या नावाने ट्रस्ट स्थापनेची घोषणा
प्रतिनिधी /पणजी
विजयाभाभी उत्तम गृहिणी होत्या. त्यांच्या दारातून कुणी कधी उपाशी पोटी परतला नाही. कोण किती भुकेला आहे हे ती लगेच ओळखायची. एक आदर्श बहीण, पत्नी, माता, सखी अशा अनेकविध भूमिका तिने यशस्वीपणे साकारल्या आणि तिला अखेर अमरत्व प्राप्त झाले, असे उद्गार सौ. अमिता सलत्री यांनी काढले. सौ. विजया श्रीपाद नाईक यांच्या कार्याला वाहिलेल्या ’विजयश्री’ या पुस्तक प्रकाशन सोहळय़ाच्या प्रमुख पाहुण्या या नात्याने प्रसिद्ध लेखिका, अभिनेत्री सौ. सलत्री बोलत होत्या. केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्या आडपई, दुर्भाट येथील रामनाथ भवन या निवासस्थानी हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षणतज्ञ प्रा. सुभाष वेलिंगकर, ओबीसी आयुक्त ?ड. मनोहर आडपईकर, प्रसिद्ध साहित्यकि, कीर्तनकार, प्रवचनकार ’विजयश्री’ पुस्तकाचे संपादक डा?. गोविंद काळे, उद्योजक श्री. सुभाष महानंदू नाईक आणि श्री. श्रीपाद नाईक हे व्यासपीठावर उपस्थित होते. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात माजी मुख्यमंत्री श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर, प्रा. सुभाष वेलिंगकर, शिक्षणतज्ञ श्री. दिलीप बेतकीकर, सौ. आशा दिगंबर कामत, ड. मनोहर आडपईकर, श्री. नारायण (भाई) नाईक आदि मान्यवरांचे लेख अंतर्भत आहेत.
प्रारंभी मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे सरचिटणीस श्री. सुरज नाईक यांनी उपस्थितीतांचे स्वागत केले. सौ. विजया नाईक यांचे बंधू श्री. संतोष महानंदू नाईक यांनी सौ. विजया यांच्या आठवणी सांगताना, अशी बहीण आम्हाला लाभली हे आमचे सद्भाग्य आहे, असे नमूद केले.
प्रा. सुभाष वेलिंगकर, ?ड. मनोहर आडपईकर, डॉ. गोविंद काळे यांनी त्यांच्या समयोचित भाषणात सौ. विजया नाईक यांच्या आठवणी आणि गुणवैशिष्टे कथन केली.
श्री. श्रीपाद नाईक यांनी त्यांची धर्मपत्नी सौ. विजया नाईक यांच्याबरोबरच्या जीवनप्रवासातील काही प्रसंग सांगताना, एक आदर्श पत्नी म्हणून कर्तव्य निभावताना तिने सासर आणि माहेर अशा दोन्ही घरांची जबाबदारी यशस्वीपणे पेलली. ’विश्वची माझे घर’ या भावनेतूनच तिने कार्य केले. तिने आपली सेवा करण्याची संधीच दिली नाही, याचे शल्य शेवटपर्यंत बोचत राहील, असे भावनात्मक उद्गार काढले.
सौ. विजया नाईक यांच्या नावाने ट्रस्ट स्थापनेची श्री. नाईक यांनी घोषणा केली. श्री. सुभाष नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.