ऑनलाईन टीम/ तरुण भारत
आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गोवा विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आले असता त्यांनी आज पणजी येथे पत्रकार परिषद घेत सत्ताधारी भाजपच्या कामगिरीवर निशाणा साधला. यावेळी पत्रकार परिषदेला आपचे उमेदवार उपस्थित होते. यावेळी सर्व उमेदवारांनी विजयानंतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही अशी शपथ घेतली.
दरम्यान, गोवा प्रचारासाठी आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी आज पणजी येथे पत्रत्रकार परिषद घेत भाजपने गोव्यात मोठा भ्रष्टाचार केल्साचा गंभीर आरोप करत भ्रष्टाचारामुळे सामान्य नागरिकांना सुविधा मिळत नसल्याचा आरोपही यावेळी केजरीवाल यांनी केला. तसेच काँग्रेस, भाजप ने गोव्यातील मतदारांची फसवणूक केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
विशेषबाब म्हणजे केजरीवाल यांच्या उपस्थितीत गोवा आपच्या उमेदवारांनी निवडून आल्यानंतर पक्षाशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली. तसेच विजयानंतर उमेदवार इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. तसेच निवडून आल्यानंतर कुणीही सर्वसामान्यकडून कोणतेही लाच घेणार नाही. अधिकारी किंवा इतर कोणीही बेकायदेशीर काम केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी शपथ यावेळी घेण्यात आली.
दरम्यान, दरम्यान पूर्वीं केजरीवाल यांनी निवडणूक निकालानंतर कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी आप च्या उमेदवारांनी आज शपथ घेतली. यांनतर माध्यमांनी केजरीवाल यांना इमानदार उमेदवार असताना अफिडेंटिव्ह करण्याची गरज का भासली असा प्रश्न केला असता याला उत्तर देताना केजरीवाल यांनी जनतेच्या विश्वासाठी हा प्रयत्न केले असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. तसेच हे अफिडेंटिव्ह पत्रक गोवेकारांच्या प्रत्येक घरात पोहचवणार माहितीही केजरीवाल यांनी दिली.