प्रतिनिधी/ सातारा
रविवारी दुपार पासुन पडलेल्या वळीवाच्या पावसामुळे शहर परिसराला चांगलेच झोडपले. या पावसाबरोबरच विजांचा गडगडाट ही तितकाच होता. तसेच कित्तेक ठिकाणी विजा ही पडल्या यामुळे कित्तेकांच्या घरातील इलेक्ट्रिकल साहित्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
शहरातील शनिवार पेठ, माची पेठ, आदी भागातील नागरिकांचे टिव्ही, इंटरनेट रावटर, मोबाईल, फ्रीज, मिक्सर सारख्या साहित्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच लॉकडाऊन मुळे सर्व व्यवसाय ठप्प आहेत. कित्तेक नागरिकांच्या आर्थिक उत्पन्नाला खिळ बसली आहे. त्यातच आता या विजेच्या झटक्याने घरातील साहित्याचे नुकसान झाल्याने नागरिकांच्या खिश्याला चांगलीच खिळ बसली आहे. तसेच सध्या कित्तेक नागरिक हे वर्कर्फाम होम सेवा बजावत आहेत, त्यातच इंटरनेट रावटर खराब झाल्याने संबंधीतांची चांगलीच तारांबळ उडाली.
सध्या नुकसान झालेले इलेक्ट्रिकल साहित्ये ही दैनंदिन जिवनात वापरात येणाऱया अत्यावश्यक वस्तु असुन त्यांच्या वापराविण्या एक दिवस घालविणे ही कठीण झाले आहे. त्यातच आता लॉकडाऊन मुळे सर्व इलेक्ट्रीकल साहित्य विक्रीची दुकाने बंद आहेत. तसेच कोरोनाचा कहर वाढत असल्याने साहित्य दुरूस्ती करण्याकरीता एखाद्या व्यक्तीला घरात बोलाविणे म्हणजे कठीण झाले आहे. तसेच मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना मनोरंजनाचे साहित्य बंद असल्यामुळे त्याची त्वरीत दुरूस्ती करून घ्या, अशी मागनी वेळोवेळी होत असल्यामुळे संबंधीत नागरिकांना चांगलीच डोकेदुखी ठरली आहे.