प्रतिनिधी / म्हासुर्ली
बलशाली भारत होण्यासाठी देशाला चारित्र्यवान युवकांची गरज असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे विभागीय समन्वयक प्राध्यापक डॉ. एम. के. कांबळे यांनी व्यक्त केले. मौजे गवशी (ता. राधानगरी ) येथे कळे येथील विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिर उद्घाटनप्रसंगी प्रा. कांबळे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एम लाडगावकर होते. तर कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षा म्हणून मौजे गवशी गावच्या सरपंच गीता सुतार होत्या. शिबीराचे उद्घाटन श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख वक्ते म्हणून विलास पांडुरंग पाटील यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना म्हटले की आज देशाला संस्कारक्षम युवकांची गरज असून युवकांची जडणघडण केवळ राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून होऊ शकते.
अध्यक्षस्थाथानांवरुन बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. म. लाडगावकर म्हणाले, की विद्यार्थी ही देशाची संपत्ती असून देशाचे भवितव्य विद्यार्थ्यांच्या हातात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात सहभागी होऊन आपली कार्यक्षमता सिद्ध करावी.
प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक कमलाकर राक्षसे यांनी केले. शिबिर संयोजन प्राद्यापक एन. एन. सूर्यवंशी, प्रा. कृष्णा पात्रे, प्रा. मनाली कांबळे, प्रा. प्रेरणा चव्हाण प्रा. व्ही. पी. कांबळे हे करत आहे. तर सदर श्रम संस्कार शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता, जल संवर्धन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, बंधारा निर्मिती, पर्यावरण जनजागृती इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहेत. यावेळी स्वयंसेवक शरद आनंदा देसाई याने महाविद्यालयाच्या इमारतीची प्रतिकृती तयार केली होती. कार्यक्रमाला सर्जेराव गणपती पाटील, राऊ दत्तू पाटील, उपसरपंच छाया कांबळे, यशवंत पात्रे, व्ही. बी. रावत सर, पांडुरंग पात्रे, आनंदराव नाळे सर, दिनकर पात्रे, नारायण पात्रे, सतीश पाटील, संभाजी पाटील सर्व ग्रामस्थ, प्राध्यापक, विद्यार्थी, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. अंजली कुंभार हीने केले. तर आभार प्रा. कृष्णा पात्रे यांनी मानले.