-नरसय्या आडम मास्तरांसह प्रमुख नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
प्रतिनिधी/सोलापूर
राज्यातील साधारण चार लाख विडी कामगारांच्या रोजगारावर एका व्यक्तीने दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे संक्रांत आली आहे. रोजगार वाचविण्यासाठी सोलापुरातील 50 हजार महिला विडी कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता विडी उद्योगावरील संकट परतवून लावण्यासाठी लढÎाच्या मैदानात उतरल्या आहेत. बुधवारी (23) सेंटर ऑफ इंडियन टेड युनियन्स संलग्न लाल बावटा विडी कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, पूनम गेट येथे ज्ये÷ नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम, सिटूचे राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली 50 हजार विडी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. रखरखते ऊन असतानासुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाल झेंडा खांद्यावर घेऊन पोटतिडकीने आमचा रोजगार वाचवा अशा गगनभेदी घोषणा दिल्या.
सकाळी नऊ वाजल्यापासून संपूर्ण सोलापूर शहर आणि गोदूताई वसाहतीतील महिला विडी कामगार पूनम गेट येथे जमा झाल्या. समाजकल्याण कार्यालयापासून ते ख्रिस्तीसेवा मंडळ तसेच पूनम गेट ते सिद्धेश्वर हायस्कूल असा संपूर्ण परिसर विडी कामगारांनी व्यापून टाकला. कोरोनाने मरण्यापेक्षा न्याय हक्कासाठी आणि रोजगारासाठी जर मरण आले ते वीरमरण समजू असे स्फुरण विडी कामगारांमध्ये दिसून आले. याप्रसंगी आडम मास्तर म्हणाले की, धूम्रपानामुळे कोरोना होण्याचा धोका जास्त आहे असा तर्क लावून एका याचिकाकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात विडी विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी यासाठी 20 एप्रिल 21 रोजी जनहित याचिका 10276/2021 ने दाखल केली आहे.
या याचिकेवर 22 एप्रिल 2021 रोजी पहिली सुनावणी झाली. त्यानंतर 3 मे रोजी दि. 20 मे, 27 मे, 2 जून, 8 जुन, 15 जून, 16 जून, इत्यादी तारखास मुंबई उच्च न्यायालय सुनावणी झाली. यात महाराष्ट्र राज्य सरकारने बाजू मांडताना निसर्ग न्याय तत्वाचा वापर करुन राज्यातील 4 लाख विडी कामगारांवर येणाऱया उपासमारीचा विचार ही केला पाहिजे. महाराष्ट्र शासनाच्या महाधिवक्त्यांनी याचिकाकर्त्याला पुरक अशी बाजू मांडली आहे. यामुळे राज्यातील विडी कामगारांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. कोरोनापेक्षा ही भयंकर अशी उपासमारीची वेळ त्यांच्यावर येणार आहे.
एम.एच.शेख म्हणाले कि, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकाच्या बाजूने निकाल जाहीर झाला तर राज्यातील 4 लाख विडी कामगार क्षणार्धात भिकेला लागतील. हा संभाव्य धोका असून याकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. उलटपक्षी धुम्रपान केल्यास कोरोनाचा संसर्ग होतच असे स्पष्ट वैज्ञानिकांचे मत नाही. याचेही याचे अध्ययन राज्य सरकारच्या अधिवक्ता कडून केला गेला नाही. ही खेदाची बाब आहे.
यावेळी व्यासपीठावर कॉ. नसीमा शेख, नगरसेविका कामिनी आडम, सुनंदा बल्ला, सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख, कुर्मय्या म्हेत्रे, मुरलीधर सुंचू, फातिमा बेग, रंगप्पा मरेड्डी, म. हनीफ सातखेड, सलीम मुल्ला, अनिल वासम, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते उपस्थित होते. अनिल वासम यांनी सूत्रसंचालन केले.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी विल्यम ससाणे, बापू साबळे, दाऊद शेख, वासिम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, अप्पाशा चांगले, हसन शेख, रफिक काझी, अशोक बल्ला, अकिल शेख, नरेश दुगाने, विरेद्र पद्मा, दीपक निकंबे, बाळकृष्ण मल्याळ, विनायक भैरी, श्रीनिवास गड्डम, बालाजी गुंडे, अंबादास बिंगी, किशोर गुंडला, नागेश म्हेत्रे, शाम आडम, मल्लेशम कारमपुरी, दत्ता चव्हाण, विजय हरसुरे, दिनेश बडगू, नरेश गुल्लापल्ली ,बजरंग गायकवाड, भारत पाथरूट, शिवा श्रीराम, अंबाजी दोन्तुल, प्रवीण आडम, महादेव घोडके, अनिल घोडके, प्रकाश कुऱहाडकर आदींनी परिश्रम घेतले.
…तर एक लाख विडी कामगार रस्त्यावर येतील
आडम मास्तर म्हणाले, उच्च न्यायालयात राज्य सरकार कामगारांची सकारात्मक बाजू न मांडल्यास एक लाख विडी कामगार कुटुंबासह बेमुदत धरणे आंदोलन करतील. आगामी काळात याहून उग्र स्वरूपाचे अर्थातच एक लाख विडी कामगार कुटुंबासह बेमुदत धरणे आंदोलन करतील.