प्रतिनिधी/ बेळगाव
सरकारने विणकर व्यवसाय करणाऱया मालकांना पॅकेज जाहीर केले. मात्र मागावर काम करणाऱया कामगारांना कोणतेच पॅकेज जाहीर केले नाही. यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. आम्ही काम केल्यानंतरच साडय़ांचे उत्पादन होते. असे असताना आमच्याकडे दुर्लक्ष केले असून तातडीने विणकर कामगारांची नोंद करून घेऊन आम्हालाही पॅकेज द्यावे, अशी मागणी विणकर कामगारांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परजिह्यातून आम्ही कामानिमित्त बेळगावात आलो आहे. हातमाग मालकांकडे आम्ही अनेक वर्षांपासून काम करत आलो आहोत. आता लॉकडाऊनमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हातमाग आणि यंत्रमाग मालकांना सरकारने पॅकेज जाहीर केले. त्यामध्ये कामगारांना मात्र काहीच देण्यात आले नाही. हा आमच्यावर अन्याय आहे.
विणकर कामगारांची नोंद करून घेऊन आम्हाला विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी केली आहे. शिरस्तेदार एम. एम. नदाफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शंकर कामकर, रवी पाटील, विठ्ठल बंगोडी, बलराम संगोळी, सिद्धाप्पा मोदगी, शंकर सातपुते, मंजु कौजलगी यांच्यासह कामगार उपस्थित होते.