प्रतिनिधी/ मडगाव
जगभरात अडकलेल्या गोमंतकीयांना गोव्यात परत आणण्यासंदर्भात काय स्थिती आहे हे सरकारने स्पष्ट करावे. कारण कित्येकांना कामावरून काढून टाकले असून काहींनी माघार घेतलेली आहे. अशा छोटय़ा कंपन्यांत काम करणाऱयांना आणि ज्यांना चार्टर फ्लाइट परवडत नाही त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. वंदे भारत मिशनच्या अंतर्गत या अडकून पडलेल्या गोमंतकीयांना गोव्यात आणण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी सरदेसाई यांनी उचलून धरली आहे.
सर्वपक्षीय बैठकीनंतर 10 रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ज्या ‘एसओपी’ला सहमती दर्शविली होती व घोषणा केली होती ती ‘एसओपी’ जिल्हाधिकाऱयांकडून अजूनही अधिसूचित केली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हवाई मार्गाने येणाऱयांना हे नियम का लागू होत नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे. सध्या त्रासात असलेल्या व अन्य देशांत अडकून पडलेल्या गोमंतकीयांचे हाल सरकारला दिसत नाहीत काय, असा प्रश्नही सरदेसाई यांनी विचारला आहे.