नवी दिल्ली
विदेशी गुंतवणूकदारांसह कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेचा सामना अर्थव्यवस्थेलाही करावा लागतो आहे. मे महिन्यात आजवर विदेशी गुंतवणुकदारांनी 4 हजार 444 कोटी रुपये भारतीय बाजारातून काढले आहेत. 1 ते 21 मे दरम्यान विदेशी गुंतवणुकदारांनी (एफपीआय) शेअर बाजारातून 6 हजार 370 कोटी रुपये काढले तर बाँडमध्ये 1 हजार 926 कोटी रुपये गुंतवले आहेत. सध्याच्या परिस्थितीत शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार टाळाटाळ करत आहेत.