मंगळूर/प्रतिनिधी
राज्य आरोग्य विभाग कन्नड जिल्ह्यातील कर्नाटक-केरळ सीमेजवळ राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेऊन विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होईल याचीही दक्षता घेईल, तसेच सरकारच्या अनिवार्य आरटी-पीसीआर चाचणी नियमामुळे अडथळा आणू नका असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री सुरेश कुमार एस यांनी सांगितले.
केरळ येथून येणाऱ्या प्रवाशांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी अहवाल ७२ तासापेक्षा जुना नसावा नितीन घेण्यात आला आहे. नियमितपणे सीमा ओलांडणार्या प्रवाश्यांसाठीही हा नियम लागू आहे.
केरळमधील हजारो विद्यार्थ्यांनी मंगळूरमधील संस्थांमध्ये शिक्षणासाठी येत असतात. नर्सिंग कॉलेजांमध्ये सापडलेल्या कोरोना प्रकरणांनी जिल्हा प्रशासनाला जाग अली आहे. तथापि, शनिवारी एका कार्यक्रमात मंत्री कुमार यांनी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ देऊ नये, यासाठी आराखडा तयार करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.