बसफेऱयांची संख्या कमी असल्याने धोकादायक प्रवास ः परिवहनने बसफेऱया वाढविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शाळा-महाविद्यालयांना प्रारंभ झाल्याने बसने प्रवास करणाऱया प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, प्रवाशांच्या तुलनेत बसफेऱयाची संख्या अगदी कमी असल्याने विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. कित्येक दिवसांपासून हा प्रवास सुरू असला तरी परिवहनला याबाबत कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच फरफट होताना दिसत आहे. परिणामी अपघाताची शक्मयता वाढली आहे. वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बसफेऱया वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.
शहरातील आरपीडी कॉर्नर, यंदे खुट, धर्मवीर संभाजी चौक, चन्नम्मा चौक आदी ठिकाणी गर्दी वाढत असल्याने विद्यार्थ्यांना लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विशेषतः सकाळ व सायंकाळच्या वेळेत हे चित्र पाहायला मिळत आहे.
पालकांतून चिंता व्यक्त
अनियमित बससेवेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाची फरफट होताना दिसत आहे. दरम्यान, बस पकडण्यासाठी विद्यार्थी बसच्या पाठीमागे धावताना दिसत आहेत. त्यामुळे मोठय़ा दुर्घटनेची चिंता पालकांतून व्यक्त होत
आहे.
शिवाय काही बसचालक बसथांब्याहून शंभर-दोनशे फूट पुढे बस थांबवत आहेत. दरम्यान, पळत जाऊन बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू होते. अपुऱया बससेवेमुळे असे प्रकार दररोज शहरातील मुख्य बसथांब्यांवर घडत आहेत. त्यामुळे बसफेऱया वाढवाव्यात, अशी मागणी विद्यार्थीवर्गातून होत आहे.
परिवहनने गांभीर्य घेणे आवश्यक
शहराबरोबर ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. शाळा-महाविद्यालयीन शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, त्या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना मिळेल त्या बसने धोकादायक प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, काही विद्यार्थी बसच्या दरवाजात लोंबकळत थांबून प्रवास करताना दिसत आहेत. याबाबत आता परिवहनने गांभीर्य घेणे आवश्यक आहे.
सकाळी, सायंकाळी जीवघेणा प्रवास
सकाळी व सायंकाळच्या वेळेला बसमध्ये जागा मिळविण्यासाठी विद्यार्थी शर्यतीसारखे धावत सुटतात, तर अनेकजण खिडकीला लटकून शाळेची बॅग खिडकीतून आत टाकून जागा पकडण्यास धडपडत असतात. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ही स्थिती पाहता सदरचा प्रवास विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्यासारखा आहे. अशा स्थितीत परिवहनने जादा बसेसची सोय करण्याची गरज असल्याचे मत विद्यार्थी व्यक्त करत आहेत.