ऑनलाईन टीम / मुंबई
सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात परीक्षा घेणे शक्य नाही आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्यावर महाराष्ट्र सरकार ठाम आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.
ते म्हणाले, अनेक राज्यांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास सांगणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळणे असेच होईल. महाराष्ट्रात परीक्षा घेण्यास पालक आणि विद्यार्थी यांचाही विरोध आहे. आणि जर महाराष्ट्रात परीक्षा घेतली आणि विद्यार्थ्यांना कोरोना झाला तर त्याची जबाबदारी यूजीसी घेणार का ?असा प्रश्न ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे आगामी दोन महिने तरी परीक्षा घेणे शक्य नाही.
तसेच वाईन शॉप आणि विद्यार्थ्यांची तुलना करणं हे चुकीचं आहे असे ही त्यांनी यावेळी म्हटले. कोरोना संपल्यावर परीक्षा घेण्यास राज्य सरकार तयार आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले.