महाविद्यालये सुरू झाल्याने केएसआरटीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील पदवी, पदव्युत्तर महाविद्यालये मंगळवारपासून पुन्हा सुरू झाली आहेत. मात्र, बस आणि बसपासची सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थी महाविद्यालयात हजर झालेले नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाने (केएसआरटीसीने) खूशखबर दिली आहे. 2019-20 या वर्षात देण्यात आलेल्या बसपासची मुदत 10 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
परिवहन मंडळाच्या या निर्णयामुळे पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. राज्यातील विद्यापीठे, स्वायत्त विद्यापीठे, पदवी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, डिप्लोमा महाविद्यालये 17 डिसेंबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुकुलतेसाठी केएसआरटीसीने 2019-20 या वर्षात विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या बसपासची मुदत 10 डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चालु शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या महाविद्यालयातील शुल्क भरणा केलेली पावती आणि मागील वर्षी वितरीत केलेले पास दाखवून बसमधून प्रवास करता येणार आहे.