खानापूर तालुक्यातील 379 शाळा आजपासून गजबजणार
खानापूर / वार्ताहर
तब्बल 9 महिन्यांच्या विश्रातीनंतर शिक्षण खात्याने शाळा सुरू करण्याचे आदेश बजावले आहेत. आज 1 जानेवारी नववर्षाचे स्वागत करत प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक प्रवेश देण्यासाठी शिक्षण खात्याने जय्यत तयारी हाती घेतली आहे खानापूर तालुक्मयात तब्बल 379 शाळा आजपासून गजबजणार असून प्रत्येक शाळेत सोयी-सुविधांसह स्वच्छता अभियान राबविले आहे.
खानापूर तालुक्मयात 346 प्राथमिक तर 53 माध्यमिक शाळा आहेत. सर्व शाळांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सॅनिटायझरसह स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुख्यमंत्री व शिक्षण खात्याने प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्याचे आदेश बजावले आहेत. या आदेशानुसार गेल्या दोन दिवसांपासून तालुका शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. प्रत्येक शाळ. कोविड नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांनी तयारी हाती घेतली आहे. संबंधित गावातील ग्रामपंचायतीना शाळेमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचन तालुका पंचायत विभागाने दिल्या आहेत. गेल्या 9 महिन्यापासून कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे यावषी शिक्षण विभागाचे गणितच कोलमंडले. जूनपासून सुरू होणाऱया शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ कोरोनामुळे गंभीर परिस्थितीत अडकला. सदर महामारी कधी एकदा संपेल यासाठी शिक्षण विभागाने अनेक वेळा शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ करण्यासाठी योजना आखल्या परंतु या महामारीचा वाढता प्रभाव लक्षात घेता शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात अनेक अडचणी आल्या. पण आता या महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शैक्षणिक वर्षाला सुरू करण्यासाठी शिक्षण खात्याने कंबर कसली आहे. प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छता अभियान, पालक मेळावा, शाळा सुधारणा कमिटी याच्या बैठका घेऊन जागृती करण्यात आली आहे. नववर्षाचे स्वागत करताकरता विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक शाळेत विशेष कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे.
केंद्र व राज्य शासनाने अजूनही कोविड संदर्भात सतर्कता राखण्याचे आदेश बजावले आहेत. परंतु शैक्षणिक वर्षाचा घोळ लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ सुरू करण्याचे प्रयत्न हाती घेतले आहेत. गेल्या नऊ महिन्यामध्ये कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले आहेत विद्यागमन सारख्या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु याचा कितपत परिणाम विद्यार्थ्यांच्यावर झाला हे सांगणे कठीण आहे.
1787 शिक्षकांसह कर्मचाऱयांची कोविड टेस्ट
खानापूर तालुक्मयातील 1787 शिक्षकांची शिक्षण खात्याने कोरोना तपासणी करण्यात आहे. शिक्षकांना त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच शाळेवर हजर राहण्याचे आदेश गटशिक्षणधिकाऱयांनी बजावले आहेत. याचे सर्व शिक्षकांनी पालन केले आहे.
पटसंख्या वाढीसाठी करावी लागणार कसरत
शैक्षणिक वर्षाचे गणित कोलमडल्याने अनेक विद्यार्थी शाळापासून दुरावले आहेत. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱया शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीसाठी पटसंख्यांची जुळवा जुळव करण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागणार आहे. अनेक विद्यार्थी शाळा नसल्यामुळे परगावी गेले आहेत तर अनेक विद्यार्थी शिक्षणाकडे पाठ फिरवत शाळेला जाण्यासाठी नकारात्मक भूमिका दर्शवित असल्याची चित्रे ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहेत. विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते दूर झाल्याने पालकांनाही आता विद्यार्थ्याना समजावून शाळेत पाठविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
खानापूर तालुक्मयाच्या ग्रामीण भागामध्ये शेतीबरोबर वीट व्यवसाय करतात. शाळा सुरू नसल्याने अनेक पालकांनी आपल्या मुलांना वीट व्यवसायासाठी जुंपले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्याना आता शाळेकडे आणण्यासाठी पालकांना तसेच शिक्षकांना कंबर कसावी लागणार आहे
नियमांचे पालन करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण एकुंडी
खानापूर तालुका गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यानी अनेक प्रकारच्या मार्ग सूची शिक्षकांना दिल्या आहेत. मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन अनेक शाळांमध्ये नियमांचे पालन करण्यासाठी सूचना केल्या आहेत. पहिल्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यामध्ये शैक्षणिक जागृत करण्यासाठी सूचना केल्या आहेत. वर्गामध्ये गर्दी होणार नाही, मुलांचा गट करून तासांचे शिक्षण देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेला पाठवून द्यावे, असे आवाहन केले आहे.