ऑनलाईन टीम / हैदराबाद :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. मात्र, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
आंध्र प्रदेशातील विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात भरलेली फी आता 100 टक्के परत दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना 4 टप्प्यात हे फीचे पैसे मिळणार आहेत. त्यासाठी सरकारने विद्या दिवेता योजना तयार केली आहे. विद्यार्थ्यांच्या आईच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत.
आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा देण्यासाठी जगनमोहन रेड्डी सरकारने विद्यार्थ्यांना संपूर्ण फी परत करण्याचा निर्णय घेतला आहे.