बेळगाव / प्रतिनिधी
आगामी शैक्षणिक वर्षापासून नवीन धोरण राबविण्यास सकारात्मक असून विद्यार्थ्यास पायाभूत साक्षरता व तंत्रज्ञान आत्मसात व बौद्धिक विकास व अध्ययनाच्या तत्त्वावर आधारित अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. यासाठी शिक्षकांनी तयार राहणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन उमेश कुमार यांनी केले. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी शाळेच्या सभागृहात विद्याभारती कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत विद्याभारती क्षेत्रीय सहसंघटन कार्यदर्शी जी. आर. जगदीश, राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे, सुजाता दप्तरदार, राघवेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, ओमकार, भारतमाता फोटो पुजन व दीपप्रवलन करण्यात आले. आर. के. कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सुजाता दप्तदार यांनी स्वागत केले. परमेश्वर हेगडे, जी. आर. जगदीश यांनी आढावा घेतला. उमेश कुमार व ऍड. चेतन मणेरीकर यांनी नविन राष्टीय शैक्षिणिक धोरण याबद्दल माहिती दिले. विद्या भारती सलग्नित शाळेच्या मुख्याध्यापिकानी आपल्या शाळेच्या वार्षिक योजनेची माहिती दिली. यावेळी जयंत तिईकर, सदानंद कपिलेश्वर, रामनाथ नाईक, माधव पुणेकर, डॉ. बी अनिल कुमार, विजयालक्ष्मी पाटील, श्रध्दा पाटील, ज्योती कित्तुर, ऋतुजा जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रिती कोलकार तर सुजाता दप्तरदार यांनी आभार मानले.