बेळगाव जिल्हय़ात चुरस वाढली : इच्छुकांची अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू : आठवडाभरात उमेदवार जाहीर होणार
अमर गुरव /निपाणी
विधानपरिषद निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहेत. त्यानुसार 16 नोव्हेंबरपासून अधिसूचना जारी होणार आहे. 10 डिसेंबर रोजी मतदान तर 14 रोजी मतमोजणी होणार आहे. डिसेंबरअखेर अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात निवडणूक होईल, अशी शक्मयता होती. मात्र, तत्पूर्वीच अचानक निवडणूक जाहीर झाल्यामुळे इच्छुकांची पळापळ सुरू झाली आहे. जिल्हय़ात भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
बेळगाव जिल्हय़ात विधानपरिषद निवडणुकीत गत दोन टर्मचे चित्र पाहता केवळ तडजोडीचे राजकारण दिसून येते. मर्यादित मतदान असल्याने उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे? यापेक्षा जिल्हय़ातील नेत्यांशी त्यांचे कसे संबंध आहेत? यावर या निवडणुकीची गणिते अवलंबून असतात. मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढणे व पुढील निवडणुकीत बेरजेच्या राजकारणात फायदेशीर ठरेल, अशा उमेदवारास सहकार्य करणे, असा ढोबळ ताळेबंद या निवडणुकीत मांडला जातो. त्यामुळे या निवडणुकीतही शह-काटशहाचे राजकारण रंगणार असल्याचे चित्र आतापासूनच दिसत आहे.
गतवेळी डिसेंबर 2015 मध्ये विधानपरिषद निवडणूक झाली होती. यात भाजपचे महांतेश कवटगीमठ व काँग्रेसच्या सहकार्याने अपक्ष उमेदवार विवेकराव पाटील यांनी विजय मिळविला. त्यावेळी काँग्रेसचे प्रथम पसंतीचे उमेदवार माजी मंत्री वीरकुमार पाटील व दुसऱया पसंतीचे उमेदवार व्ही. एस. साधुन्नावर यांना पराभव स्वीकारावा लागला. त्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी ठरवून वीरकुमार पाटील यांचा पराभव घडवून आणल्याचे बोलले गेले. अर्थात वीरकुमार पाटील यांच्याही काही चुका त्यांना महागात पडल्या होत्या. एकमेकांची जिरवण्याच्या नादात नुकसान झाल्याची कबुली त्यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रमांमध्ये दिली आहे.
काँग्रेसअंतर्गत बंडाळी
आता पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसतर्फे विधानपरिषदेसाठी उमेदवारी मागितली आहे. जिल्हय़ात दोनपैकी एका जागेवर काँग्रेस उमेदवार उभा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी एकूण आठ जणांनी उमेदवारी मागितली आहे. यामध्ये प्रामुख्याने वीरकुमार पाटील यांच्याबरोबरच विद्यमान सदस्य विवेकराव पाटील, माजी खासदार प्रकाश हुक्केरी, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी, काँग्रेस नेते व्ही. एस. साधुन्नावर यांचे पुत्र डॉ. किरण साधुन्नावर तसेच गोवा काँग्रेसचे प्रभारी सुनील हनमण्णावर यांचा समावेश आहे. गत कार्यकाळात विवेकराव पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव मतदारसंघात फारसा संपर्क ठेवला नाही. त्यामुळे मतदारांमध्ये काहीशी नाराजी असली तरी या निवडणुकीत मतदारांपेक्षा नेत्यांच्या नाराजीला महत्त्व असते. त्यामुळे नेत्यांची नाराजी घालविण्यात विवेकराव पाटील कितपत यशस्वी ठरतात? यावर त्यांची उमेदवारी अवलंबून आहे.
दुसरीकडे वीरकुमार पाटील यांनी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून तर बेळगावचे चन्नराज हट्टीहोळी यांनी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या माध्यमातून प्रयत्न चालविले आहेत. साधुन्नावर यांनी गत विधानपरिषद निवडणुकीत लक्षणीय मते मिळविली. त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सतीश जारकीहोळी यांना मोठी मदत केली. त्याच्या बदल्यात त्यांनी आपले पुत्र डॉ. किरण साधुन्नावर यांच्या उमेदवारीचे घोडे पुढे दामटले आहे. त्याला कितपत यश मिळते, हे आठवडाभरातच समजणार आहे.
भाजपमध्येही इच्छुक वाढले
दुसरीकडे राज्यात व केंद्रात एकहाती सत्ता तसेच जिल्हय़ातही लक्षणीय मतदान असल्यामुळे भाजपमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. विद्यमान सदस्य महांतेश कवटगीमठ यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्यांनाही पक्षांतर्गत असंतोषाचा सामना करावा लागण्याची शक्मयता आहे. तर माजी मंत्री शशिकांत नाईक यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षनि÷, निष्कलंक चेहरा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनि÷ असल्यामुळे त्यांनीही पक्षश्रे÷ाrंकडे अंतर्गत लॉबिंग सुरू केले आहे. तर राज्यसभा उमेदवारीत अपयश मिळाल्याने विधानपरिषद तरी घ्यायची या उद्देशाने माजी खासदार व बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती हेदेखील प्रयत्न करत असल्याचे समजते. उमेदवारीसाठी जोरदार चुरस झाल्यास राज्यसभेप्रमाणे भाजप धक्कातंत्राचा अवलंब करू शकते, असेही बोलले जात आहे. तसेच दोन जागा असल्याने भाजप दोन्ही जागांवर उमेदवार उभा करणार की केवळ एकाच जागेवर? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
लखन जारकीहोळी अपक्ष?
दरम्यान, लोकसभा पोटनिवडणुकीवेळी भाजप उमेदवार मंगला अंगडी यांच्यासाठी मंत्री जगदीश शेट्टर व उमेश कत्ती यांनी लखन जारकीहोळी यांची भेट घेतली होती. त्यावेळी विधानपरिषदेवर संधी देण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते. आमदार रमेश जारकीहोळी यांनीही बंधू लखन जारकीहोळी यांच्यासाठी भाजप श्रे÷ाrंकडे प्रयत्न चालविले आहेत. यात यश न आल्यास लखन यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविण्याची तयारी जारकीहोळी गटाकडून सुरू आहे. तसे झाल्यास पुन्हा एकदा गटातटाचे राजकारण उफाळून येण्याची शक्मयता आहे.
8800 मतदार निवडणार आमदार
बेळगाव जिल्हय़ात स्थानिक स्वराज्य संस्था गटात सुमारे 9700 मतदार आहेत. मात्र, जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकीपूर्वीच विधानपरिषद निवडणुकीची घोषणा केल्यामुळे मतदारसंख्या कमी झाली आहे. याबरोबरच निधन, अपात्र व राजीनामा आदी कारणांमुळे काही जागा रिक्त आहेत. त्यामुळे सुमारे 8800 इतके मतदार दोन आमदार निवडणार आहेत. काँग्रेस एका जागेवर उमेदवार देणार आहे तर भाजपने अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत. त्यामुळे उमेदवार निश्चित झाल्यानंतर खऱया अर्थाने निवडणुकीला रंग येणार आहे.
प्रकाश हुक्केरींचे ‘कुठले पण द्या !’
यंदाच्या विधानपरिषद निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे खासदारपद व राज्यात मंत्रिपद भूषविलेल्या प्रकाश हुक्केरी यांनी काँग्रेस पक्षश्रे÷ाRकडे विधानपरिषदेसाठी उमेदवारीची मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था गटातून व वायव्य शिक्षक मतदारसंघातून अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. यापैकी मिळेल ते स्वीकारण्याची तयारी त्यांची असल्याचे समजते. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यात त्यांना यश येते की नाही? हे या आठवडय़ात समजणार आहे.