प्रतिनिधी/ सातारा
विनाकारण फिरल्याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमेधा संदीप साठे(वय 40, रा. रांगोळे कॉलनी), राजू विश्वनाथ लोंढे(वय 46, रा. शाहुपूरी), अनुप अशोक जगदाळे(वय35, रा. दर्शन रेसिडेन्सी), अल्ताफ नुरमुहमद इनामदार(वय 22, रा. पवाराची निगडी) यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहुपूरी पोलीस तपास करत आहेत.