नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रवाशांनी तिकीट न काढता रेल्वेमधून प्रवास केल्याने रेल्वेला मोठा नफा झाला आहे. विनातिकीट प्रवाशांकडून रेल्वेला सुमारे 30 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. ही कमाई यावषी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत झाली आहे. यामध्ये बुकिंग न करता रेल्वेमध्ये अवजड सामान नेणाऱया काही रेल्वे प्रवाशांचाही समावेश आहे. तसेच रेल्वेस्थानक परिसरात अस्वच्छता करणाऱयांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दीड-दोन वर्षात कोरोना संसर्गामुळे रेल्वेंची संख्या कमी असली तरी काही एक्स्प्रेस रेल्वे सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होत्या.