बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱयांची संख्या वाढली : कारवाईची मनपाची मोहीम थंडावली
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने मागील महिन्यात अनलॉक करण्यात आले. पण कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबलेला नाही. कोरोना हद्दपार झाल्याप्रमाणे शहरातील बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. महापालिकेची विनामास्क कारवाई थंडावली आहे. मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्मयता असल्याचे आरोग्य खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. अनलॉक झाल्यानंतर नागरिकांनी मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष केले आहे. बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असून तोंडावर मास्क लावण्याकडे कानाडोळा केला जात आहे. अशातच विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईची मोहीम महापालिकेने थांबविली आहे. एकीकडे तिसरी लाट रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना आरोग्य खाते करीत आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडूनच खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
रुग्ण वाढल्यास पुन्हा विकेंड लॉकडाऊनची शक्यता
सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असतानाच केरळ राज्यात रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्हय़ातही रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. कोरोना डेल्टाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे राज्याच्या सीमेवर कडक तपासणी करण्यात येत असून रुग्णांच्या संख्येत 15 टक्क्मयांहून अधिक वाढ झाल्यास विकेंड लॉकडाऊन करण्यात येण्याची शक्मयता आहे.