रत्नागिरीच्या बाजारात 14 जणांवर कारवाई, 7 हजाराचा दंड वसूल
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी शहरात बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱया दुकानदार, विक्रेते, नागरिकांवर नगर परिषदेच्या फिरत्या कारवाई पथकाची नजर कायम आहे. बुधवारी देखील विनामास्क फिरणारे 14 जण या पथकाच्या कारवाईच्या कचाटय़ात अडकले. त्यांच्याकडून 7 हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
लॉकडाऊन शिथिल केले असले तरी विना मास्क बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहे. तरीही अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमाणात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.
अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. रत्नागिरीत शहर व परिसरात अनेकजण कोरोना संपल्यासारखे विनामास्क फिरणाऱयांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यांना कारवाईचे कोणतेही भय राहिलेले नाही. शहर परिसरात अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी नगर परिषद, पोलीस व प्रशासनाने फिरते पथकाची नियुक्ती केलेली आहे. वेळोवेळी या पथकामार्फत बाजारात विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
बुधवारी 25 नोव्हेंबर रोजी देखील या पथकाने दुकानदार, विक्रेते, नागरिकांवर नजर रोखली होती. त्यावेळी 14 जण कारवाईच्या रडारवर आले. त्यांच्याकडून प्रत्येकी 500 प्रमाणे 7 हजार रु. दंड वसूल करण्यात आला. आतापर्यंत या पथकाकडून 2 लाखांपेक्षा अधिक दंड विनामास्क फिरणाऱयांकडून वसूल केला आहे.