पोलीस व नगर परिषद प्रशासन पथकाची कारवाई
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात विना मास्क वावरणाऱयांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सर्वत्र वावरताना मास्क वापरण्याची सक्ती केलेली असताना विनामास्क असलेल्या 7 जण सोमवारी भरारी पथकाच्या तावडीत सापडले. त्यांना 3500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी इतर प्रतिबंधक उपाययोजनांबरोबरच प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. तरीही अनेकजण विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. अशा विनामास्क फिरणाऱयांवर पोलीस व प्रशासनाच्या भरारी पथकाची नजर ठेवण्यात येत आहे. सोमवारी रत्नागिरी शहरात या पथकाने 7 जणांना विनामास्क असताना कचाटय़ात पकडले.
त्यांच्यावर प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यापुढेही ही कारवाई चालूच राहणार असल्याचे नगर परिषदेच्या भरारी पथकातील कर्मचाऱयांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्येकाने तोंडावर मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.