कोरोनाच्या प्रभावामुळे विविध उद्योगधंद्यांसोबत अन्य उत्पादनांचे क्षेत्र प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. सदर क्षेत्रास दिलासा देत त्यांना रुळावर आणण्यास केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजना सुरु केली आहे. यामध्ये पीएम स्व निधी नावाची एक योजनाही सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत रस्त्यावर काम करुन जगणाऱया फेरिवाल्यांना 10 हजार रुपयापर्यंतचे कर्ज विनागॅरेंटीचे देण्यास सुरुवात केली आहे.
सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार 2.6 लाख इतके प्रस्ताव या कर्जासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये 64 हजार प्रस्तावांना मंजुरी मिळालेली असून जवळपास 5,500 जणांना सदरची रक्कम देण्यात आली आहे. या कामगिरीचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकताच केला आहे.
फेरिवाल्याच्या मदतीसाठी ही नवीन मदत सादर केली आहे. यामध्ये सरकारने पाच हजार कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. याचा लाभ जवळपास 50 लाख रस्त्यांच्याकडेला व्यवसाय करणाऱया फेरिवाल्यांना होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ही योजना हाऊसिंग आणि शहरी विभाग मंत्रालयाकडून सादर करण्यात आली आहे.
निवडक लोकांचा समावेश
रस्त्यांच्याकडेला राहणारे, फेरिवाले, दुकान चालविणारे आदी लोक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात. यासोबत फळ भाजी, इस्त्री, सलून आणि पान दुकानेही या वर्गात समावि÷ करण्यात आल्याची माहिती आहे.