सातारा / प्रतिनिधी :
शहरात लॉक डाऊन असले तरी काही भाजी विक्री करणारे शहरात चुकीच्या पद्धतीने आपली दुकाने थाटताना दिसतात.अशा विक्री करणाया सोशल डिस्टन्स न पाळणायाना पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.त्याकरता मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी पथक नेमले आहे.
शहरातील नागरिकांच्या हितासाठी पालिका झटत आहे.मात्र, काही विक्रेतें जाणीवपूर्वक आपली दुकाने मांडून कायदा मोडत आहेत.सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याचे आढळून येत आहे.अशा ठिकाणी कारवाई करण्यासाठी सातारा पालिकेने मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी पथक नेमले आहे.हे पथक दररोज सातारा शहरात गस्त घालत असून ते पथक कारवाई करत आहे.त्या पथकाचा चांगलाच धसका घेतला आहे.सातारा पालिकेने घरपोहच भाजी विक्रीची सुविधा केली आहे.