प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊननंतर देशातील एक महत्त्वाचे विमानतळ म्हणून समोर येत असलेल्या बेळगाव विमानतळाने नोव्हेंबर महिन्यात 30 हजारांचा प्रवासी टप्पा गाठला आहे. त्यामुळे विमानतळाने कर्नाटकातील तिसऱया क्रमांकाचे स्थान अबाधित ठेवले आहे. बेंगळूर व मंगळूर या आंतरराष्ट्रीय विमानतळांनंतर बेळगावच्या विमानतळाचा क्रमांक लागत आहे.
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात 30 हजारांच्या जवळ प्रवासीसंख्या पोहचली होती. परंतु लॉकडाऊनमध्ये ती खाली घसरली. मे महिन्याच्या अखेरीपासून विमानसेवा सुरू केल्यानंतर पुन्हा प्रवासीसंख्या हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यात 30 हजार 336 प्रवाशांनी बेळगावमधून प्रवास केल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. चांगल्या सेवा बेळगावमधून मिळत असल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. यामुळे बेळगावच्या विकासात वाढ होत असून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होऊ लागले आहेत.
667 विमानांच्या झाल्या फेऱया
बेळगावमधून प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे विमान कंपन्या नव्या मार्गांवर सेवा देण्यासाठी चाचपणी करीत आहेत. सध्या बेळगावमधून अलायन्स एअर, इंडिगो, स्पाईस जेट, स्टार एअर, ट्रुजेट या कंपन्या सेवा देत आहेत. त्यामुळेच नोव्हेंबर महिन्यात एकूण 667 विमानांच्या फेऱया झाल्याची नोंद झाली आहे. लॉकडाऊन नंतरच्या काळात इतर विमानतळांच्या तुलनेत बेळगावमधून विमानांची ये-जा अधिक पटीने वाढली आहे.
डिसेंबरमध्ये प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्मयता
बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या कमालीची वाढली आहे. डिसेंबर महिन्यात नव्या शहरांना विमानसेवा सुरू होत असल्याने या संख्येत अजून भर पडणार आहे. चेन्नई शहराला दररोज विमानसेवा आता मिळणार आहे. त्याचबरोबर स्टार एअर सुरत व बेंगळूर या दोन्ही शहरांना विमानसेवा देत असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.