मुंबई / ऑनलाईन टीम
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा अदानी समूहाकडे गेला आहे. यानंतर मुंबई विमानतळावर गरबा खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी आम्हाला डिवचण्यासाठी गरबा कराल तर आम्हालाही आमचा झिंगाट दाखवावा लागेल, असा इशारा दिला आहे.
नितीन सरदेसाई यांनी ट्विट करत म्हटले आहे की, फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलं आहे, विमानतळ मुंबईमध्येच आहे, असं म्हणत एकप्रकारे इशारा दिला आहे. “फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलंय …विमानतळ मुंबईमध्येच आहे…आम्हाला डिवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नितीन सरदेसाई यांनी यापूर्वी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातू इशारा दिला होता. मुंबई विमानतळावरून GVK चे रेड्डी गेले आणि अदानी आले. व्यवस्थापन कोणाचे ही असो पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल हे लक्षात असू द्या,असा शब्दांत सरदेसाई यांनी इशारा दिला होता.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाता ताबा आता अदीनींकडे आला असून त्यांनी ताबा मिळताच कंपनीचं मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवलं आहे. विमानतळ मुंबईत तर मुख्यालय अहमदाबादेत असं काहीसं चित्र निर्माण झालंय.