ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे भारतातील विमान क्षेत्राला 21 हजार कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागू, शकतो, असा अंदाज क्रेडिट रेटिंग संस्था असलेल्या इक्रा लिमिटेडने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.
कोरोना महामारीमुळे 23 मार्च नंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध घालण्यात आले होते. कमी उत्पन्न आणि अधिक खर्च यामुळे विमान क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. मार्च 2022 पर्यंत भाडेकरारावरील देणी सोडून विमान उद्योगावरील कर्ज 50 हजार कोटी रूपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीत इंडिगो आणि स्पाईसजेट लिमिटेड यांना दररोज 31 कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता यात सुधारणा होत असून, दररोजचे नुकसान 26 कोटी पर्यंत आले आहे.