प्रतिनिधी / कडेगाव
विरळी ता. कवठेमहांकाळ येथील नवनाथ साळुंखे या आत्महत्याग्रस्त नाभिक समाजातील कुटुंबाला भाजपा संवेदना सोशल फाउंडेशनच्यावतीने एक लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला.
नवनाथ साळुंखे यांनी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कुटुंब चालवण्यासाठी आर्थिक उत्पन्न असल्याने नैराश्याच्या भावनेतून आत्महत्या केली होती.त्यामुळे नवनाथ साळुंखे यांचे कुटुंबीय हवालदिल झाले होते. सदर कुटुंबाला आर्थिक आधाराची गरज होती. ती गरज भाजपा संवेदना सोशल फाउंडेशनच्यावतीने पूर्ण करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख बाबा यांच्या प्रयत्नातून या कुटुंबाला भाजपा संवेदना सोशल फोंडेशनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या हस्ते सदरचा धनादेश देण्यात आला.
यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कडेगाव तालुका भाजपाध्यक्ष धनंजय देशमुख, कडेगाव पंचायत समितीचे उपसभापती आशिष घार्गे, उदय देशमुख, नितीन शिंदे, संतोष डांगे, सुनील गाढवे, कडेगाव तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष संभाजी जाधव, जिल्हा सल्लागार विश्वास सूर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष सुशांत सूर्यवंशी, कार्याध्यक्ष नवनाथ शिंदे, प्रसिद्धी विभाग प्रमुख नाना शिंदे, युवा अध्यक्ष दत्ता क्षीरसागर, जिल्हा संघटक सतीश लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन सपकाळ, तालुका अध्यक्ष विजय वास्कर, माजी तालुकाध्यक्ष प्रवीण सपकाळ संजय सपकाळ, जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र पवार, अमर पवार, सचिन झेंडे, विलास पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.