मुंबई / प्रतिनिधी
केंद्रीय यंत्रणा जाणिवपुर्वक आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्रातीलअऩेक मंत्री करत आहेत. गेले कित्येक दिवस सुरु आहे. हे आरोप – प्रत्यारोपांची मालिका अजुन ही थांबलेली नाही. यातच गुरुवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं असुन. यावेळी ईडीच्या कारवाया, मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी, ओबीसी आणि मराठा आरक्षण, १२ आमदारांचे निलंबन मागे घेणे असे गोंधळाचे अनेक विषय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजणार आहेत. तेसेच विरोधक ही अत्यंत आक्रमक असणार असल्याची चर्चा सुरू आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे हाती आलेले काही अपडेट
भाजपने आक्रमक होतं अटकेत असलेला मंत्रिपदावर कसा ? हा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून प्रचंड घोषणाबाजी
राज्यपालांविरोधात प्रस्ताव आणण्याचा विचार असल्याचे नाना पटोले यांनी केलं स्पष्ट
राज्यपालांनी सभागृह सोडून निघून जाणे दुर्दैवी – जयंत पाटील
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताच महाविकास आघाडीकडून गोंधळ.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणादरम्यान महाविकासआघाडीची जोरदार घोषणाबाजी.
शिवरायांबद्दलच्या वक्तव्याबद्दल राज्यपालांनी माफी मागावी. राज्यपालांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतोय – काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले
राज्यपालांनी अभिभाषणाला सुरुवात करण्याआधी राष्ट्रगीताचे गायन झाले. यानंतर त्यांनी अभिभाषणाला सुरुवात करताच़ जोरदार घोषणाबाजी सुरू होती. यामुळे राज्यपालांनी अभिभाषण अर्धवट सोडले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सदस्यांनी घोषणाबाजी करायची नसते, हा संकेत आहे. परंतु यामुळे व्यथित होऊन राज्यपालांनी अभिभाषण अर्धवट सोडले आहे.