ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबमध्ये काही दिवसांतच विधानसभा निवडणूक आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या नातेवाईकांवर ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.राष्ट्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो, असं मी यापूर्वीच सांगितलं आहे. या यंत्रणांचा वापर लोकांना घाबरवण्यासाठी केला जातो. तसेच मोदी सरकार विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करत आहे, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला. निवडणूक काळात असं होऊ नये आणि असं चालणार देखील नाही, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.