एसटी कर्मचाऱयांचा संप सुरूच
प्रतिनिधी/ सातारा
एसटी ‘कर्मचाऱयांचे राज्य शासनात विलगिकरण करा’ या मागणीसाठी मागील काही दिवसांपासुन एसटी कर्मचाऱयांनी संप पुकारला आहे. कर्मचाऱयांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाला आज एक महिना पुर्ण झाला. मागील महिण्याच्या 8 तारखेपासुन या कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. संपुर्ण भारतात एसटी कर्मचाऱयांनी पुकारलेला हा सर्वात मोठा संप आहे. या सर्वांमुळे राज्य परिवहन मंडाळाचे महिन्याभरात जवळपास 13 कोटी पर्यंतचे नुकसान झाले आहे. पण या संपामुळे खासगी वाहन चालकांना सध्या सुग्गीचे दिवस आल्याचे दिसत आहे.
सध्या संपातील शासकीय कर्मचारी वर्ग सेवेत हजर झाले आहेत. पण वाहक आणि चालक मात्र अद्यापही आपल्या मागणीवर ठाम असुन संपाबाबत योग्य तो तोडगा न मिळल्याने हा संप अद्याप ही सुरूच आहे. शासनातर्फे कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ केली, पण कर्मचारी वर्ग विलगीकरणाच्या मागणीवर अद्याप ठामच आहेत, त्यामुळे हे आंदोलन सुरूच आहे. शासनातर्फे हा संप मोडीत काढण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले. पण आंदोलक मात्र आपल्या मागणीवर ठाम आहे. आंदोलनातील अनेक कर्मचाऱयांना निलंबनाची नोटीस तर काहींना सेवा समाप्तीच्या नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. पण आंदोलक मात्र आपल्या मागणीवर ठामच आहे.
सातारा जिल्हय़ातील 11 आगारातुन 742 फेऱयांपैकी मंगळवारी सायंकाळ पर्यंत 161 गाडय़ा सोडण्यात आल्या. यापैकी 39 गाडय़ा या शिवशाही तर 122 गाडय़ा या लाल परीच्या सोडण्यात आल्या. एकुण 900 कर्मचारी हे सेवेत हजर झाले असुन यामध्ये आंदोलनातील 42 वाहन चालक व 41 कंडक्टर हजर झाले होते. ग्रामीण भागात ही काही प्रमाणात एसटीच्या फेऱया सुरू असुन सातारा आगारातुन मंगळवारी जवळपास 25 फेऱया रवाना झाल्या होत्या. त्याचबरोबर कराड, वडुज, पाटण, महाबळेश्वर, वाई आदी भागातुन ग्रामीण भागात एसटीची सोय करण्यात आली आहे, मात्र यांची संख्या मात्र कमी आहे. आंदोलनातील एकुण 292 जणांचे निलंबन केले आहे तर 131 जणांना सेवा समाप्तीच्या नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.
खासगी वाहन चालक जोमात व राज्य परिवहन मंडळ कोमात
या संपामुळे प्रवाश्यांचे मात्र आतोनात हाल होत असुन अनेक प्रवाश्यांना नाईलाजास्तव खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक खासगी वाहन चालकांनी आपल्या दरात वाढ गेली आहे. त्यामुळे अधिक रक्कम देऊन प्रवाश्यांना प्रवास करावा लागत आहे. सध्या आगारातुन काही बसेसची सोय करण्यात आली आहे. पण या फेऱया अत्यंत तुरळक आहेत. त्यामुळे पुर्वी प्रमाणे कधी बसेस सुरू होणार याची आस अनेक प्रवाश्यांना लागली आहे. एकंदरीत परिस्थिती ‘खासगी वाहन चालक जोमात आणि परिवहन मंडळ कोमात’ असे वातावरण निर्माण झाले आहे.
वाहनांचे ही नुकसान
या संपामुळे अनेक एसटी जागेवरच उभ्या असल्याने अनेक एसटीच्या चाकांची हवा कमी होने, बॅटरी खराब होणे आदी प्रकार घडले आहेत. कारण लॉकडाऊन काळात ही अशाच प्रकारे अनेक वाहने जाग्यावरच उभी असल्याने या वाहनांचे मेंटेनंस ही तितकेच करावे लागले होते. तशीच काहीशी परिस्थिती सध्या ही निर्माण झाली आहे.