प्रतिनिधी/ रत्नागिरी
विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी असलेले प्रमादीय कर्मचारी कामावर हजर झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कोणतीही कारवाई करणार नाह़ी ही विभागीय नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांची मागणी एसटी कर्मचाऱयांकडून फेटाळून लावण्यात आली आह़े एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून आता संपातून माघार घेणार नाही, अशी माहिती संपकरी एसटी कर्मचाऱयांनी ‘तरूण भारत’जवळ बोलताना दिल़ी
यावेळी संघटनेकडून सांगण्यात आले की, यापूर्वी रत्नागिरी विभागातील कर्मचाऱयावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आह़े कर्मचाऱयांना कारवाई करण्यासंबधी नोटीस पाठवण्यात आली आह़े असे असताना केवळ दिखावा करण्यासाठी शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार नाही, असे विभागाकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे कर्मचाऱयांची केवळ दिशाभूल करण्याचे काम विभागीय नियंत्रक करत असल्याचा आरोप संपकरी कर्मचाऱयांकडून करण्यात आला आह़े
विलिनीकरणाच्या मागणीसंदर्भात सोमवारी मुबई येथे राज्य शासनाकडून भूमिका स्पष्ट करण्यात येणार आह़े संपाबाबत मुंबई येथूनच निर्णय घेण्यात येणार आह़े रत्नागिरीमधील कर्मचारी हे विलिनीकरणाच्या मागणीसाठी ठाम आहेत, असे एसटी कर्मचाऱयांकडून सांगण्यात आले. दरम्यान जिह्यात रविवारीही एसटीच्या 400 हून अधिक फेऱया सोडण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े तर 657 कर्मचारी हजर झाले आहेत़ तर 160 अधिकृत रजेवर असणाऱया कर्मचाऱयांचाही समावेश आह़े हजर झालेल्या कर्मचाऱयांमध्ये 254 प्रशासकीय, 193 कार्यशाळा, 81 चालक, 66 वाहक, 63 चालक तथा वाहक आदींचा समावेश आह़े कर्मचाऱयांच्या संख्येत वाढ होत असल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले.