कामगारांना योग्य वेळी पगार नाही, कचऱयाची व रस्त्यांची समस्या.
डिचोली / प्रतिनिधी
डिचोली नगरपालिका क्षेत्रात उदभवणाऱया विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी डिचोलीतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेत धडक देत प्रथम पालिका अभियंता व नंतर पालिका प्रशासकांची भेट घेतली. या भेटीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर गरमागरम चर्चा केली. पालिका क्षेत्रातील समस्यांवर लक्ष पुरविताना पालिकेतील संबंधित अधिकाऱयांकडून पाहणी करून घेत नंतर त्या सोडविण्याचे आश्वासन पालिका प्रशासक विवेक गावणेकर यांनी दिले.
डिचोली नगरपालिका कामगारांना वेळेवर पगार घातला जात नसल्याने सदर कामगारांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. गेले दोन तीन महिने सदर समस्या सुरूच असून त्यावर पालिका प्रशासनातर्फे ठोस पावले उचलली जात नाहीत. पालिका कर्मचारी आपल्या कामात सदैव कर्तव्यदक्ष असतात. तरीही त्यांच्या कामाचि तसेच मेहनतीचा मोबदला त्यांना वेळेवर न देणे म्हणजे डिचोली सारख्या आतापर्यंत स्थिर नगरपालीका म्हणून टेंबा मिरविणाऱया नघरपालिकेसाठी शरमेची बाब आहे. अशी टिका, काँग्रेसचे दिलीप धारगळकर यांनी केली.
यावेळी यूवि काँग्रेसचे अध्यक्ष मनोज नाईक, फैरोज बेग, नझीर बेग, मुस्तफ्फा बेग व इतरांची उपस्थिती होती.
साधनसुविधा विकासाच्या नावाखाली डिचोली नगरपालिकेतील मागील मंडळाने पालिकेचा संपूर्ण निधी साफ केला आहे. वास्तविक पालिकेतर्फे विकासासाठी सरकारच्या विविध खात्याकडून विविध माध्यमातून उपलब्ध होणाऱया निधीचा वापर करणे योग्य असते. मात्र डिचोलीत पालिकेतर्फे विविध माध्यमातून वसूल होऊन येणाऱया कर व इतर प्रकारच्या महसूलाचा केव. विकास हाच मुद्दा समोर ठेऊन खर्च करण्यात आल्याने आज पालिकेसमोर कामगार वर्गाला पगार घालण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत. याला सर्वस्वी सत्तेतील मागील पालिका मंडळ जबाबदार आहे, असा आरोपही दिलीप धारगळकर यांनी केला.
पालिकेतील सर्व लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यामुळे आज सर्व पालिका मंडळ बरखास्त झालेली आहेत. असे असताना आज पालिका क्षेत्रातील विविध समस्या आणि विषय हाताळण्याची जबाबदारी पालिका प्रशासकांची आहे. मात्र डिचोलीत वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. अनेक समस्या असूनही त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. आणि सदर समस्यांविषयी जाब विचारण्यास गेल्यास प्रशासक पालिकेत वेळेवर भेटत नाही. भेटले तर त्यांच्याकडून आम्ही मांडलेल्या विषयांवर कानाडोळा केला जातो. अशा परिस्थितीत निवडणुका होऊन नवीन पालिका मंडळ स्थापन होईपर्यंत लोकांनी आपल्या कामांसाठी कोणाकडे पहायचे ? असा प्रश्न युवा अध्यक्ष मनोज नाईक यांनी उपस्थित केला.
पालिका कामगारांच्या पगाराबरोबरच पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी कचऱयाचे साम्राज्य थाटलेले आहे. तसेच रस्त्यांची वाताहात झालेली आहे. या सर्व विषयांवर पालिकेला निवेदने सादर करून तसेच पाठपुरावा करूनही पालिकेतर्फे कोणतीची कार्यवाही केली जात नाही. याकडे कोण पाहणार. लोकांनी आता आपल्या कामांसाठी कोणाकडे पहायचे ? असे सवालही मनोज नाईक यांनी उपस्थित केले.
पालिका प्रशासकांची भेट.
डिचोली काँग्रेसच्या वरील कार्यकर्त्यांनी पालिकेत वरील विषयांवर चर्चा करण्यासाठी भेट दिली असता त्यांना सर्वप्रथम प्रशासक भेटू शकले नाही. त्यांनी पालिका अभियंता आशिक खान यांची भेट घेतली. व त्यांच्याशी चर्चा केली. तर दुसऱया दिवशी पालिका प्रशासक विवेक गावणेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी केलेल्या चर्चेत सर्व विषय सविस्तरपणे मांडण्यात आले. सदर विषयी पालिकेला यापूर्वी रितसर निवेदने सादर केली असून पालिका कानाडोळाच करीत आहे. असे मनोज नाईक यांनी सांगितले. त्यावर सर्व विषय प्रशासक गावणेकर यांनी स्वतः लिहून घेत त्यांची पालिका अभियंत्यांसक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले.
(ँर्दे) कामगारांना पगार घालण्यासाठी पालिकेकडे निधी नाही ?
या भेटीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पालिका कर्मचाऱयांना पगार घालण्यास होत असलेल्या विलंबाचा विषय लावून धरला असता सदर कामगारांना पगार घालण्यासाठी पालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याचे समजले. दर महिन्यला पालिकेच्या तिजोरीत येणाऱया विविध माध्यामाच्या कर, दंड, कचरा कर, भाडे यांच्या सहाय्याने कामगारांनापगार घातला जातो. तर आजच्या परिस्थितीत पालिकेकडे सुरक्षित ठेवी राहिलेलीच नाही. असा खुलासा या कार्यकर्त्यांना मिळाला. त्यामुळे आज या पालिकेची आर्थिक परिस्थिती विकासाच्या नावाखाली केविलवाणी करून ठेवली असून त्याला सर्वस्वी मागील कार्यकाळातील पालिका मंडळ जबाबदार आहे, असा आरोप मनोज नाईक व दिलीप धारगळकर यांनी केला.