दसरोत्सव मिरवणुकीला परवानगी द्या- कॅम्प येथील विविध समाजांचे निवेदन : महापुरातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची भारतीय कृषक समाजाची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटनांनी निवेदनांचा भडिमार केला. यामध्ये दरवषी कॅम्पमधील विविध समाजांचे नागरिक दसरोत्सवानिमित्त मिरवणूक काढतात. त्या मिरवणुकीला परवानगी द्यावी, यासाठी कॅम्पमधील विविध संघटनांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. आम्ही सर्व नियमांचे पालन करून मिरवणूक काढणार आहे. तेव्हा आम्हाला परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सणांवर निर्बंध लादण्यात येत आहेत. असे असले तरी दसरोत्सवानिमित्त कॅम्प येथील कुंतीदेवी मंदिर, तेलगु कॉलनी, मद्रास कोनाला, आर. ए. लाईन, के. टी. पुजारी यांच्यावतीने शहरातून मिरवणूक काढण्यात येते. विजयादशमीनिमित्त ही मिरवणूक काढली जाते. तेव्हा यावषीही आम्हाला दसरोत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात
आली.
सीमोल्लंघनासाठी शहरातील विविध देवस्थानच्या पालख्या तसेच सासनकाठय़ा ज्योती कॉलेजच्या मैदानावर एकत्रित येतात. त्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत, हे चुकीचे आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्बंध हटवून आम्हाला दसरोत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. कोरोनाबाबतच्या ज्या अटी आहेत त्या अटी आम्हाला घालून द्या. अटी आम्ही पाळू. मात्र परवानगी ही दिलीच पहिजे, असे या निवेदनात म्हटले
आहे. यावेळी दामोदर पुजारी, विजय माने, मनोहर कांबळे, सचिन स्वामी, मल्लेश चौगुले, सुनील जाधव, रमाकांत कोंडुसकर यांच्यासह कॅम्प परिसरातील नागरिक उपस्थित
होते.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. ही घटना अत्यंत गंभीर आहे. यावरून अजूनही देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत. उत्तर प्रदेश सरकार महिलांचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरले आहे. तेव्हा या सर्व प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर कारवाई करावी, याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला सदस्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. हाथरस येथील त्या तरुणीच्या कुटुंबीयांवर दबाव घालण्यात येत आहे. त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून झाल्यानंतर या घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली नाही. तिचा मृतदेहही नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नाही. तेथील जिल्हा प्रशासनाने कायद्याचे उल्लंघन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाबाबत काहीच गांभीर्य घेतले नाही. या सर्व गोष्टी गंभीर आहेत. तेव्हा तातडीने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य महिला सदस्या रूपा देसाई, उपाध्यक्षा एफ. ए. शेख, बाहुबली रायाप्पण्णावर, इस्माईल मुल्ला, तुकाराम कांबळे, सुरेंद्र तळवळकर, आप्पासाहेब नाईक, सदानंद पाटील, रामकृष्ण सांबरेकर, एन. के. नावगेकर, हिना काकर, मुमताज शेख, रियाज कित्तूर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते..
अथणी तालुक्मयातील ‘त्या’ गावांचा सर्व्हे करा
मागील वषी आलेल्या महापुरामुळे अथणी तालुक्मयातील जोगूळ, मंगावती, शहापूर या परिसरातील शेतीचे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले. नुकसान होऊन एक वर्ष उलटले तरी अद्याप शेतकऱयांना आणि घरे कोसळलेल्या कुटुंबीयांना अजून नुकसानभरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे हे सर्व शेतकरी अडचणीत सापडले असून तातडीने सर्व्हे पूर्ण करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय कृषक समाज या शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 2019 मध्ये
ऑगस्ट महिन्यात मोठा पाऊस झाला. महाराष्ट्रातूनही कृष्णा नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी आले. त्यामुळे या तिन्ही गावांत त्या नदीचे पाणी शिरले. त्यामुळे शेतीचे नुकसान झालेच. त्याचबरोबर बऱयाच जणांची घरेही जमीनदोस्त झाली. मात्र अधिकारी आणि सरकारी कर्मचारी या गावांकडे फिरकलेच नाहीत. काही जणांना नुकसानभरपाई मिळाली तरी बहुसंख्य नुकसानीपासून वंचित राहिले आहेत. योग्यप्रकारे सर्व्हे झाला नाही. तेंव्हा जिल्हा प्रशासनाने या परिसराचा सर्व्हे करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी लिंगराज पाटील, गुरुगौडा पाटील, अकिला पठाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.