रुक्मिणी श्रीकृष्णाला पुढे म्हणाली –
आणि बळि÷ांहीं केला द्वेष । ऐसें बोलिले परमपुरुष ।
तेंही सत्यचि हा विशेष । सावकाश अवधारा । कुत्सित इंद्रियांचा जो गण । बाह्यज्ञानें बळि÷ पूर्ण ।
ते द्वेषिती तुजलागून । अप्राप्त म्हणून अप्रिय त्यां।
अप्रिय म्हणोनि द्वेषनि÷ । प्रवृत्ति मानिती परम मि÷ ।
भेदें विषयीं रत पापि÷ । भोगिती कष्ट यास्तव ते । आम्ही त्यक्तनृपासन । ऐसें बोलिले जें भगवान ।
ऐका तयाचें निरूपण । सत्य म्हणोन प्रतिपादी । तुझे सेवक जे विरक्त । विषयीं विमुख निजात्मरत ।
तिहें नृपासन जें त्यक्त । गाढ ध्वान्त मानूनी ।
परम दुष्कृत निरयस्थान । गाढ अन्धतम नृपासन ।
तें तव सेवक त्यजिती पूर्ण । मां तूं कोठून स्वीकरिसी । अस्पष्टमार्गगामी आम्ही । नाकळो लौकिकमार्गधर्मीं ।
हेंही बोलिलां सत्य स्वामी । नेणिजे अधर्मी पथ तुमचा । रुक्मिणी म्हणते-हे त्रिविक्रमा! आपण राजे लोकांच्या भीतीने समुद्रात येऊन लपला आहात हे आपले म्हणणेही बरोबर आहे. परंतु हे राजे म्हणजे तीन गुण.
आपण जणू त्यांच्याच भीतीने अंत:करणरूप समुद्रामध्ये चैतन्यघन अनुभूतिस्वरूप आत्म्याच्या रूपामध्ये विराजमान असता. आपले राजांशी वैर आहे हेही खरेच! पण ते राजे म्हणजे ही क्षुद्र इंद्रिये! यांच्याशी आपले वैर आहेच! आणि, हे प्रभो! आपणास राजसिंहासन नाही हेही योग्यच आहे; कारण आपल्या भक्तांनीसुद्धा राजपद म्हणजे अज्ञानांधकार समजून त्याचा त्याग केला आहे. तर मग आपण त्याचा स्वीकार कसा कराल?
त्वत्पदपद्मामोद भ्रमरा । होवोनि सेविती जे मुनिवर ।
त्यांचाचि मार्ग नेणती नर । जे पामर पशुरूपी ।
नराकार पशूंच्या व्यक्ति । विवेकशून्य विषयीं रमती ।
आहारनिद्राभयस्त्रीरति । ते कैं जाणती मुनिपदवी ।
त्वत्पदपद्मभजकांचा आचार । नरपशूंतें अगोचर ।
मा तूं केवळ परमेश्वर । त्वत्पथ गोचर केंवि तयां ।
पिहित मार्ग तव भजकांचा । अलौकिक यालागीं साचा । म्हणोनि अस्पष्ट मार्ग तुमचा । बोलिला वाचा तो सत्य। अस्पष्टमार्गी यालागिं आम्हां । आश्रयिती ज्या सकाम वामा । त्या भोगिती दु:खधामा । ऐशिया नर्मा वदलां जे।
रुक्मिणी पुढे म्हणते – आपण म्हणता की, आपला मार्ग स्पष्ट नाही आणि लौकिकातील पुरुषांप्रमाणे आपण वागतसुद्धा नाही, हेही खरेच! कारण मुनी आपल्या पादपद्मांचा मकरंदरस सेवन करतात. त्याचा मार्गसुद्धा अस्पष्ट असतो आणि विषयांमध्ये गुरफटलेल्या नरपशूंना त्याची कल्पनाही करता येत नाही.
आणि हे अनंता! आपल्याला अनुसरणाऱया आपल्या भक्तांच्या क्रियाही जर अलौकिक असतात, तर मग सर्व शक्ती आणि ऐश्वर्यांचे आश्रय असणाऱया, आपल्या क्रिया अलौकिक असतील, यात काय आश्चर्य!
आम्ही निष्किंचन म्हणोने । यथार्थ वदली प्रभूची वाणी ।
आढय़ निष्किंचनालागोनी । न भजती स्वप्नीं भो सुभ्रू । तुम्हांवांचून किञ्चिन्नाहीं । हें अकिंचनत्व तुमचे ठायीं ।
पूज्यापूज्य जें जें कांहीं । भजती तेंही पद तुमचें ।
Ad. देवदत्त परुळेकर