ऑनलाईन टीम/तरुण भारत
एका खास समुहाद्वारे सरकारी यंत्रणेमध्ये घुसण्याचे नियोजन केले जात असून देशामध्ये संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली कट्टरता वाढतच चालली आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलाय. संघाने शनिवारी जारी केलेल्या आपल्या २०२२ च्या वार्षिक अहवालामध्ये यावर मत मांडलंय. राज्यघटना आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली देशात कट्टरता तसेच जातीय उन्माद पसरवला जात असून आपले इप्सित साध्य करण्यासाठी सरकारी यंत्रणेत शिरकाव करण्याची विशिष्ट समुदायाची योजना आहे, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या वार्षिक अहवालात दिला आहे.
या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, ‘संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्या’च्या आडून ‘वाढती धार्मिक कट्टरता’ आणि ‘एका खास समुदायाकडून सरकार यंत्रणेमध्ये प्रवेश करण्याची विस्तृत योजना’ आहे. त्यामुळे ‘या धोक्याला तोंड देण्यासाठी संघटीत ताकदीसह प्रयत्नांची’ करण्याची गरज बोलून दाखवण्यात आली आहे. संघाचा वार्षिक रिपोर्ट गुजरातमधील अहमदाबाद शहरातील संघाच्या एका बैठकीमध्ये सादर करण्यात आला.