आतापर्यंत 60 लाख मजुरांनी केला प्रवास : प्रति व्यक्ती प्रवास भाडे 600 रुपये
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वेने कोविड 19 च्या संकटात विविध राज्यांमध्ये कामासाठी आलेल्या मजुरांना आपल्या मूळ गावी सोडण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडल्या होत्या. यांच्या आधारे लाखो मजुरांचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासासाठी प्रति व्यक्तीस 600 रुपयांचे प्रवास भाडे आकारण्यात आले होते. यातून कोटय़वधीची कमाई केल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.
एक मेपासून सुरु केलेल्या विशेष रेल्वेच्या फेऱयांमधून जवळपास 360 कोटी रुपयांची कमाई रेल्वेने केली आहे. रेल्वेने तब्बल 4,450 विशेष रेल्वेच्या फेऱयांमधून ही कामगिरी केली असल्याची माहिती रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी दिली आहे.
मेल, एक्सप्रेस यांच्यासाठी सामान्य प्रवास भाडे आकारले असून यासाठी कोणत्याही विशेष खर्चाची वसूली करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे तर रेल्वेने एकूण प्रवासाच्या फक्त 15 टक्के भाडे वसूल केले आहे. तसेच 85 टक्के भाडे हे सरकारकडून देण्यात आले आहे.
मजुरांसाठी चालविण्यात येणाऱया विशेष रेल्वेचा खर्च हा 75 ते 80 लाख रुपये आला असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. 14 जूनपर्यंत 222 श्रमिक रेल्वे सरकारने सोडल्या होत्या.