वृत्तसंस्था/ बेंगळूर
इंग्लंडविरूद्धच्या तिन्ही मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांतीला बगल देत आता 9 एप्रिलपासून सुरू होणाऱया आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स संघाचे नेतृत्व कोहली करत आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आरसीबी संघाला चांगले यश मिळविण्यासाठी कोहलीने आपल्या सरावाला प्रारंभ केला आहे. विश्रांती न घेता आता आपण आयपीएल स्पर्धेसाठी जोरदार सराव करत असल्याचे कोहलीने आपल्या टिव्टवर सांगितले. आरसीबीचा पहिला सामना मुंबई इंडियन्स संघाबरोबर 9 एप्रिलला चेन्नईत होणार आहे. 14 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना 30 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील प्ले ऑफ गटातील सामनेही अहमदाबादमध्ये खेळविले जातील.