प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा विश्वकर्मा विद्यावर्धक संघ, काळी आमराईच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. काळी आमराई येथील संघटनेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
कित्तूर येथील विश्वकर्मा एकदंडगी मठाचे श्री प्रमोद महास्वामीजींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विश्वकर्मा विद्यावर्धक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बडिगेर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिरसंगी येथील विश्वकर्मा समाज विकास संस्थेचे अध्यक्ष पी. बी. बडिगेर, नवलगुंदचे तहसीलदार अनिल बडिगेर, प्राचार्या डॉ. निर्मला भट्टल आदी उपस्थित होते. विश्वकर्मा समाजातील दहावी व बारावी परीक्षेत विशेष गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.