वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मस्कतमध्ये सुरू असलेल्या विश्व टेबल टेनिस पुरूष आणि महिलांच्या स्पर्धेत भारताला दोन रौप्यपदके मिळाली. महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीत भारताने ही रौप्यपदके पटकाविली.
मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वेंग चुगीन आणि चेन झीनटाँग या जोडीने भारताच्या मानव ठक्कर आणि अर्चना कामत यांचा 11-3, 11-3, 11-6 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या झेंग रूई आणि कुई मेन या जोडीने भारताचा एस मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांचा 11-6, 8-11, 12-10, 11-7 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. भारताला दुहेरीच्या प्रकारात एकूण दोन रौप्यपदके मिळाली.
महिला दुहेरीमध्ये भारताच्या श्रीजा अकुला आणि एस. सेल्वेकुमार यांनी कास्यपदक घेतले. त्यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. आता या स्पर्धेनंतर भारतीय टेबल टेनिसपटू सिंगापूरमध्ये होणाऱया 20 लाख अमेरिकन डॉलर्स बक्षीस रक्कमेच्या स्मॅश टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होणार असून या स्पर्धेतील पात्र फेरीच्या सामन्यांना 7 मार्चपासून प्रारंभ होणार असून ही स्पर्धा 20 मार्चपर्यंत चालणार आहे.