महामार्ग रोकोवेळी राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा
प्रतिनिधी/कोल्हापूर
ऊस दराच्या आंदोलनात आठ वर्षापूर्वी याच राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱयांचा उद्रेक झाला होता. रक्तकंदन झालं होत. रस्यावर रक्ताचा सडा पडला होता. वीजबिलावरून त्याची पुनर्रावृत्ती करण्यास भाग पाडू नका, असा गर्भित इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. या परिणामांचा गांभिर्याने विचार करा निमुटपणानं आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट ध्यानी घेवून दरमहा 300 युनिटसच्या आत वीज वापर असणाऱया राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची सप्टेंबरपर्यंत 6 महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करावीत, उर्वरीत बिलाला बिनव्याजी हप्ते बांधून द्यावीत या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शेट्टी यांच्या नेतृत्चाखाली पुणे-बेंगळुर राष्ट्रीय महमार्ग आंदोलन झाले. रणरणत्या उन्हातही राजू शेट्टी यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. तासभर हे आंदोलन सुरु राहिल्याने महामार्गावर वहातूक ठप्प झाली होती. शिरोलीपासून उचगावपर्यंत तसेच कोल्हापूर, हातकणंगले, दिशेने जाणाऱया रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दुपारी बारा वाजता राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदीजवळ आंदोलन सुरु झाले. आंदोलनात सहभागी होवून शेट्टी यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्हÎाच्या कानाकोपऱयातून शेतकरी, सामान्य वीज ग्राहकांच्या वाहनांच्या जथ्थेच्या जथ्थे पंचगंगा पुलाकडे येत होते. उन्हाची तमा न बाळगता सळसळत्या उत्साहात कार्यकर्ते वीजबिल माफ झालेच पहिजे. आघाडी सरकारच करायचं काय, कोण म्हणतंय देत घेतल्याशिवाय रहात नाही. दुट्टप्पी भूमिका बजावणाऱया मंत्र्याचा निषेध असो आदी घोषणांनी आंदोलन स्थळ दणाणून गेले होते. आंदोलनात भाजप वगळता महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्ष, संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेताना झटापट झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सरकराची झोप उडवू
संघटनेला कमी समजू नका कोणत्याही राजकीय लाभासाठी आम्ही संघटना चालवत नाही. पूर्वीच्या सरकारने हे पहिले आहे. तुम्हीही त्याच वाटेने जाल तर तुम्हालाही प्रसाद मिळेल. लवकरता लवकर निर्णय घ्या नाहीतर तुमचीही झोप उडवू असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे